जळगाव, (प्रतिनिधी) : ग्वाल्हेर येथील माधव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स येथे आयोजित ‘आयडीई बुटकॅम्प’ (एडीशन ३, फेस २) मध्ये जळगावच्या गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. एआयसीटीई आणि एमआयसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात देशभरातील ४४ संघ सहभागी झाले होते.
या बुटकॅम्पमध्ये महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष संगणक विभागातील राज सूर्यवंशी, विवेक ठाकूर, निशात पाटील आणि कृष्णा ठोंबरे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप आयडियाचे प्रभावी सादरीकरण करत टॉप ५ मधून प्रथम स्थान मिळवले. या विद्यार्थ्यांना प्रा. कल्पेश वाणी, प्रा. किरण बाविस्कर आणि प्रा. राजनंदिनी चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. बुटकॅम्प दरम्यान विद्यार्थ्यांना आयडिया व्हॅलिडेशन, प्रोटोटाइप डेव्हलपमेंट आणि पिचिंग स्किल्स यांसारख्या उद्योजकता कौशल्यांचे प्रशिक्षण मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अतुल बराठे आणि विभागप्रमुख प्रा. निलेश वाणी यांनी अभिनंदन केले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.








