• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

नार पार साठी आरपारची लढाईचा निर्धार.. – माजी खा. उन्मेश पाटील

गिरणा डॅम येथे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीची बैठक संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 5, 2024
in कृषी, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
नार पार साठी आरपारची लढाईचा निर्धार.. – माजी खा. उन्मेश पाटील

चाळीसगाव, नांदगाव (प्रतिनिधी) : गिरणा खोरे अतीतुटीचे खोरे असताना हक्काचे नारपार योजनेतील पाणी आम्हाला मिळालेच पाहिजे. जलसमाधी आंदोलनानंतर आता शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत जागृती करण्यासाठी मोठी चळवळ उभारण्याची गरज असून आपल्या सर्वांच्या सूचनेने कालबध्द कार्यक्रम आखला आहे. त्यावर काम करायचे आहे. यापुढे एक नेता, एक संघटना या माध्यमातून एकत्र येऊन गिरणा समृद्धीचा निर्धार केला आहे. ही लढाई निवडणूक पार करण्यासाठी नसून आमच्या हक्काच्या नार पार साठी असल्याने गावोगावी जावून नार पार ची लढाई आरपार लढू अशी गर्जना गिरणापुत्र माजी खा. उन्मेश पाटील यांनी केली आहे.

दरम्यान बुधवारी गिरणा डॅम येथे नार पार गिरणा खोरे बचाव कृती समितीच्या निर्धार बैठकीत माजी खा. उन्मेश पाटील बोलत होते. सुरुवातीला गिरणा मातेचे जलपूजन करून गिरणामाईची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. यावेळी खान्देशी हित संग्राम समिती कल्याण, गिरणा मण्याड बचाव समिती, पांझण डावा कालवा बचाव समिती, वांजुळ पाणी समिती, खान्देश जलपरिषद, जामदा कालवा समिती, मिशन ५०० कोटी लिटर या विविध संस्था , संघटनासह परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी,विविध जलसिंचन अभ्यासक आंदोलनकर्ते उपस्थित होते.

व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, खान्देशी हितसंग्रामचे भैय्यासाहेब पाटील, बापूसाहेब हटकर, वांजुळ पाणी संघर्ष समितीचे प्रा.के एन आहिरे, निखिल पवार, कळमदरीचे सरपंच शेखर पगार, गिरणा मन्याडचे विवेक रणदिवे, पांझण डावा कालवा समितीचे ऍड.राजेंद्र सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती महेंद्र पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शहरप्रमुख नाना कुमावत, ज्येष्ठ नेते के आर पाटील, नरेश साळुंखे, डॉ. रविंद्र साळुंखे, गुगळवाड सरपंच आर डी निकम, बंडू पगार, दीपक पवार, भटक्या जाती सेना जिल्हाप्रमुख मारोती काळे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठान माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोरपडे, युवासेनेचे रवी चौधरी, प्रा.आर.एम.पाटील, चर्मकार समाज राज्याध्यक्ष मोतीलाल आहिरे, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब पाटील, धर्मा काळे, चांगदेव राठोड यांच्यासह परिसरातील सरपंच, उपसरपंच विविध संघटनांचे, संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी, पत्रकार संघटना, आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निर्धार बैठकीत चतु:सूत्री कार्यक्रम..
राज्यातील कल्याण डोंबिवली ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक व सुरत येथील खान्देशी बहुल भागामध्ये जाऊन सभा घ्याव्यात. त्याचप्रमाणे केम ते गिरण्या डॅम तसेच गिरणा डॅम ते रामेश्वरम येथे ४० जलपरिषदा घेऊन नार पार योजनासाठी आंदोलन उभारणे. खान्देशातील ३२ विधानसभा मतदारसंघात जाऊन जनजागृती सभा घ्याव्यात. आपापल्या भागातील गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मधून दसऱ्यापर्यंत जनजागृती करण्याचे ठरवण्यात आले.


 

Next Post
कृष्ठरोग जनजागृती व मानवी आधिकार कार्यशाळा संपन्न

कृष्ठरोग जनजागृती व मानवी आधिकार कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड
जळगाव जिल्हा

रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड

June 17, 2026
व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप
शैक्षणिक

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 17, 2026
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर
राजकीय

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 17, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन
जळगाव जिल्हा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन

June 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group