• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 19, 2023
in जळगाव जिल्हा
0
पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव, दि.१९ – जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिले.

अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, उपसंचालक चंद्रकांत पाटील, आत्माचे कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी बॅंका व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर मेळावा आयोजित करण्यात यावा. या मेळाव्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना ही सहभागी करून घेण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यात कमीत कमी ५०० लाभार्थ्यांना लाभ पोहचला पाहिजे.

कृषी उत्पादनापासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. पीक उत्पादनाच्या खपासाठी मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा.‌ असे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले. यावेळी तृणधान्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 


Next Post
शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद

शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद

ताज्या बातम्या

प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून प्रियकराची आत्महत्या ; अमळनेर शहरातील घटना
जळगाव जिल्हा

प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून प्रियकराची आत्महत्या ; अमळनेर शहरातील घटना

May 14, 2025
आ. एकनाथराव खडसेंच्या वाहनाला किरकोळ अपघात ; मुक्ताईनगर शहरातील घटना
जळगाव जिल्हा

आ. एकनाथराव खडसेंच्या वाहनाला किरकोळ अपघात ; मुक्ताईनगर शहरातील घटना

May 14, 2025
बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुलीचा अपघातात मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना
जळगाव जिल्हा

बापाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मुलीचा अपघातात मृत्यू ; अमळनेर तालुक्यातील घटना

May 14, 2025
जिल्हा परिषदेच्या १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पडली पार
जळगाव जिल्हा

जिल्हा परिषदेच्या १०९ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पडली पार

May 14, 2025
पावणेदोन लाखांची तांब्याची तार चोरी प्रकरणी दोघांना अटक
गुन्हे

पावणेदोन लाखांची तांब्याची तार चोरी प्रकरणी दोघांना अटक

May 14, 2025
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम
शैक्षणिक

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये आशा वर्करचा मुलगा प्रथम

May 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group