• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 19, 2023
in जळगाव जिल्हा
0
पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाई द्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जळगाव, दि.१९ – जिल्ह्यातील २७ महसूल मंडळात २५ टक्के अग्रीम नुकसान भरपाईची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. तेव्हा या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत मागील भरपाई देणे बाकी असलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांनी व्याजासह नुकसान भरपाई द्यावी. असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिले.

अल्पबचत भवन येथे कृषी विभागाच्या विविध शासकीय समित्यांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे, उपसंचालक चंद्रकांत पाटील, आत्माचे कृषी उपसंचालक पांडुरंग साळवे, कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री प्रसाद म्हणाले, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी कर्ज व अनुदान मिळवून देण्यासाठी बॅंका व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा. १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर मेळावा आयोजित करण्यात यावा. या मेळाव्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या लाभार्थ्यांना ही सहभागी करून घेण्यात यावा. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगात जिल्ह्यात कमीत कमी ५०० लाभार्थ्यांना लाभ पोहचला पाहिजे.

कृषी उत्पादनापासून अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावा. पीक उत्पादनाच्या खपासाठी मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात लाभार्थ्यांचा मेळावा घेण्यात यावा.‌ असे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले. यावेळी तृणधान्य पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

 


 

Next Post
शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद

शालेय राज्यस्तर सॉफ्टबॉल स्पर्धेत जळगाव संघास अजिंक्यपद

ताज्या बातम्या

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

July 7, 2026
अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!
गुन्हे

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

July 7, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!
आरोग्य

‘एटोपिक प्रेग्नन्सी’मुळे मृत्यूच्या दारात असलेल्या २० वर्षीय महिलेला जीवदान!

July 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group