• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

समाजाची पालक संस्था म्हणजे परिवर्तन जळगाव.. – कवयित्री सुचिता खल्लाळ

परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमात सुचिता खल्लाळ यांचे प्रतिपादन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 20, 2022
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
समाजाची पालक संस्था म्हणजे परिवर्तन जळगाव.. – कवयित्री सुचिता खल्लाळ

जळगाव, दि. २० – समूह मनाच्या जाणिवा प्रशिक्षित करणं, त्याला सुशिक्षित सुसंकृत करणं, दुखावलेल्या व हिंसक समाज मनावर फुंकर घालत समाजाच पालकत्व परिवर्तन जळगाव करत आहे. परिवर्तन पुस्तक भिशी उपक्रमात बोलतांना कवियत्री सुचिता खल्लाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पुस्तक आपल्या जगाला समृद्ध करणारी गोष्ट आहे. माणूस विवेकी असावा, माणूस प्रमाणिक असावा, माणुसकीचा झरा त्यात असावा तरच वाचनाचा उपयोग झाला अस म्हणावं. आपण अधिकाअधिक स्वीकारशील व्हावं, चिंतनशील व्हावं, स्वीकारशील होणं, इतरांच्या भावना समजून घेणं, द्वेष व हिंसा या पासून लांब जाणं ह्या साठीच वाचायला हवं, किंवा वाचन केल्यावर हा बदल आपल्यात झाला तरच वाचन केल्याचा फायदा आहे.

वाचनाने विज्ञाननिष्ठ व विवेकी माणूस निर्माण होत असतो. कारण वाचनाचा संस्कार जोपासणे ही संवेदनशील माणूस असल्याची खूण आहे. पुस्तक भिशी हा परिवर्तनचा परिवर्तनशील उपक्रम असून यातून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी बळ प्राप्त होत आहे. जगातील विविध घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन तयार झाला पाहिजे. परिवर्तनचे हे विवेकी कार्य मला यासाठी महत्त्वाचे वाटते. असे मत कवयित्री सुचिता खल्लाळ यांनी मांडले.

शंभू पाटील यांच्या आग्रहातून सुचिता खल्लाळ यांनी ‘माझा समकाळ’ ही कविताही सादर केली. याप्रसंगी सांगली येथील विजया हिरेमठ यांनी सांगलीत राबविलेल्या उपक्रमाविषयी सांगितले. वाचन हे माझ्यासाठी आनंदाचं ठिकाण आहे. सांगलीत ‘संवादिनी पुस्तक परिवारा’च्या माध्यमातून त्या कार्यरत आहेत.

याप्रसंगी चित्रकार विकास मलारा, अंजली पाटील, अश्विनी बाविस्कर यांनी त्यांच्या वाचनाविषयी सांगितले. कार्यक्रमात शेवटी नितीन सोनवणे, ज्ञानेश्र्वर शेंडे, सुमेधाजी, मुकेश जाधव, श्रीकांत पाटील यांची पुढील महिन्यातील पुस्तक भिशीतील भाग्यवान वाचक म्हणून निवड करण्यात आली. ज्ञानेश्वर शेंडे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर तांत्रिक बाजू मनोज पाटील यांनी सांभाळली.


Next Post
कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

कृषी वीज ग्राहक मेळाव्यांत तक्रार निवारणाबरोबरच थकबाकीमुक्तीची साद

ताज्या बातम्या

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा आरक्षण सोडतः ‘ड’ प्रभाग सर्वसाधारण, प्रस्थापितांना दिलासा!

November 11, 2025
गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!
खान्देश

गोळीबार प्रकरण: पोलिसांना कुंटणखान्याची टीप दिल्याच्या संशयावरून गोळीबार!

November 11, 2025
मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ
जळगाव जिल्हा

मेहरुणमध्ये ‘हरिनाम सप्ताह’ व ‘ज्ञानेश्वरी पारायण’ सोहळ्याचा भक्तिमय प्रारंभ

November 10, 2025
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप
जळगाव जिल्हा

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

November 10, 2025
जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार
खान्देश

जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार

November 10, 2025
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group