• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सात्री येथील आगीत २६ लाखांचे नुकसान, पाच घरे जळून खाक !

अमळनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 5, 2025
in जळगाव जिल्हा
0
सात्री येथील आगीत २६ लाखांचे नुकसान, पाच घरे जळून खाक !

अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सात्री येथे बुधवारी रात्री सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच घरांमधील संसार जळून खाक झाला आहे. या आगीत अंदाजे २६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली. सात्री येथील आगीत घरांचे फक्त सांगाडेच शिल्लक राहिले आहेत.

आगीत गव्हरलाल संतोष बोरसे, रामचंद्र पोपट पाटील, जितेंद्र शालिक पाटील, बाळू पोपट पाटील आणि विश्वास निंबा पाटील यांच्या मालकीची घरे जळून खाक झाली आहेत. लाकूड आणि मातीच्या छताची घरे, संसारोपयोगी वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या आहेत. घरातील साहित्यदेखील जळून नष्ट झाले असून, अन्नधान्य, शेती अवजारे, मोटारसायकल, ट्युबवेल, पाण्याची टाकी, ठिबक सिंचनासाठी वापरण्यात येणारे बंडल, दोन गॅस सिलिंडर, २०० लिटर तेलाची टाकी आणि २० लिटर डिझेल देखील आगीत खाक झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

प्रांताधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, सरपंच महेंद्र बोरसे, मंडळाधिकारी योगिता न्हाळदे, ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी परवर तडवी आणि पोलिस पाटील विनोद बोरसे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. प्रशासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आग कशामुळे लागली याचा तपास केला जात आहे. आगीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. स्थानिक प्रशासन आणि मदत यंत्रणांकडून त्वरित मदतीचे प्रयत्न सुरू असून, पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आवश्यक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.


 

Next Post
तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले गंभीर जखमी ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

तरुणाच्या डोक्यात फावडा मारून केले गंभीर जखमी ; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group