जळगाव, दि. 14 – अभिनेत्री कंगना रणावतने दिल्ली येथे झालेल्या एका शो मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप करत जळगावातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून संविधानाचा अपमान केला असून अशा लोकाना वेळीच लगाम लावणे गरजेच असल्याने लोकशाहीत भारताचा द्वेष केल्याने अशा अभिनेत्रीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी जळगावातील जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.
यावेळी जळगाव जिल्हा (शहर) अध्यक्ष अशोक लाडवंजारी व महिला जिल्हाध्यक्ष (शहर) मंगला पाटील, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव प्रतिभा शिरसाट, राजेश पाटील,अॅड.सचिन पाटील, युवती जिल्हाअध्यक्ष कल्पिता पाटील, संजय चव्हाण, दिव्या पाटील, राजु मोरे, मनोज वाणी, किरण राजपुत, आरोही नेवे, डाॅ.रीजवान खाटीक, अकील शेख, अमोल कोल्हे, सुशिल शिदे, उज्वल पाटील, कोमल पाटील, मनिषा शेवाळे, राहुल टोके, पुरषोत्तम चौधरी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.