• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या १० घोषणा

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली, प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 2, 2025
in कृषी
0
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या १० घोषणा

नवी दिल्ली, (वृत्तसेवा) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. या घोषणांमुळे कृषी क्षेत्राला चालना मिळण्याची आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

▪️शेतकऱ्यांसाठी सरकारच्या महत्त्वाच्या १० घोषणा

किसान क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवली : शेतकऱ्यांना अधिक कर्ज मिळावे यासाठी किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्यात आली आहे.

युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता : देशात युरियाचे उत्पादन वाढवण्यासाठी ईशान्य भारतात तीन नवीन कारखाने सुरू करण्यात येणार असून, त्यांची उत्पादन क्षमता १२.७ लाख मेट्रिक टन असेल.

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना : १०० जिल्ह्यांमध्ये ही नवीन योजना राबवण्यात येणार असून, १.७ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

डाळींसाठी ६ वर्षांची आत्मनिर्भरता योजना : डाळींच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी सरकारने सहा वर्षांचा विशेष कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

फळ-भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष योजना : फळ आणि भाजीपाला उत्पादकांसाठी सरकार विशेष योजना लागू करणार आहे, ज्यामुळे उत्पादन आणि विक्री वाढेल.

बिहारमध्ये मकाना बोर्ड : बिहारमध्ये मकाना (फॉक्सनट) बोर्ड स्थापन करून मकाना उत्पादकांना अधिक मदत केली जाणार आहे.

समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन : अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांमध्ये मासेमारीला चालना देण्यासाठी विशेष योजना आखण्यात आली आहे.

कापूस उत्पादकतेसाठी ५ वर्षांचे अभियान : कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी पाच वर्षांचा विशेष कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यावर भर : सरकारने कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरता आणण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

कापसाच्या विविध जातींचा विकास : कापूस उत्पादनासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नवीन जाती विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. या घोषणांमुळे कृषी क्षेत्राचा विकास वेगाने होईल, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.


 

Next Post
भोकर मार्गे चोपडा बस सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

भोकर मार्गे चोपडा बस सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group