जळगाव दि.२६ – २००८ साली मुंबई येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारत माते साठी तसेच आपल्या देशाच्या रक्षणासाठी लढत वीरगती प्राप्त सर्व शूरवीरांना शहरातील काव्यरत्नावली चौकात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थितांनी पुष्प वाहून व मेणबत्त्या लावून आदरांजली वाहीली. २६/११ च्या चित्तथरारक प्रसंगांना यावेळी उजाळा देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र एनसीसी १८ बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल अभिजीत महाजन, लेफ्टनंट शिवराज पाटील, सुभेदार जहीर अहमद, संदीप कुमार, कंपनी हवालदार मेजर गुलजार अहमद, अरुण कुमार, हवालदार अमोल साळुंखे, सुंदर सिंग यांच्यासह युवाशक्ती फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.