• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

परिवर्तन पुस्तक भिशी वाचक घडवणारा उपक्रम – श्रीपाद जोशी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 30, 2022
in मनोरंजन
0
परिवर्तन पुस्तक भिशी वाचक घडवणारा उपक्रम – श्रीपाद जोशी

जळगाव, दि.३० – परिवर्तन पुस्तक भिशी सारख्या उपक्रमांनी हरवत चाललेला वाचक पुन्हा पुस्तकांकडे वळू शकतो, नवे वाचणारे घर, कुटुंब निर्माण होऊ शकते. यातूनच वाचक घडतील असे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी परिवर्तन पुस्तक भिशीच्या कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी बोलतांना त्यांनी परिवर्तनने सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच अत्यंत चांगला आहे. वाचनाची चळवळ रुजवण्यासाठी हे सुरू आहे हे मला महत्त्वाचे वाटते. बंद पडणाऱ्या मराठी शाळा पुन्हा सूरू झाल्या पाहिजेत. मातृभाषेकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे. पुस्तक निर्मितीच्या, वितरणाच्या क्षेत्रासाठी शासनाने मदतीचा हात दिल्याशिवाय पुस्तकांच्या किंमती कमी होणार नाहीत.

गावागावात चांगली ग्रंथालये, पुस्तकांची दुकाने आता उपलब्ध नाहीत त्यामुळे पुस्तकं नेमकी कुठे आणि कशी घ्यावी हा प्रश्नच आहे, त्यामुळे हरवत चाललेली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व समृध्द होण्यासाठी परिवर्तन पुस्तक भिशीतून नक्कीच वाचन चळवळ रुजण्यास मदत होईल. संविधानात आपले अधिकार आणि कर्तव्य दिलेले आहेत पण त्याची साधी एक प्रत सुद्धा आपल्या घरात असू नये यासारखं वैषम्य दुसरं नाही.

आज जवळपास ४० टक्के वाचक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तक वाचतो तर मला वाटतं १६ टक्के लोक तणाव मुक्तीसाठी पुस्तक वाचत असतात हा सर्वे सांगतो असं सुद्धा त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिशी प्रमुख मंजुषा भिडे यांनी केले. अपूर्वा पाटील, रंजना खैरनार, प्रा. गायत्री लेले, कीर्ती देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. शंभू पाटील यांनीही जोशी यांच्याशी संवाद साधाला. प्रा मनोज पाटील यांनी परिचय करून दिला तर हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

 


 

Next Post
जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

ताज्या बातम्या

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group