• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

​अमळनेर, (प्रतिनिधी) : सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून खदाणीत पडणाऱ्या मित्राला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जिवलग मित्रांचा ३० फूट खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळील खदाणीत घडली. मानव बंटी रतनानी (१४), कार्तिक विकी उध्वानी (१४) आणि दिनेश विजय पंजवानी (१७) अशी मृत मुलांची नावे असून, हे तिघेही अमळनेर येथील सिंधी कॉलनीचे रहिवासी होते.

 

​मिळालेल्या माहितीनुसार, हे तिन्ही मित्र मंगळवारी सायंकाळी खदाणीच्या परिसरात गेले होते. खदाणीत पाण्यामध्ये एका बेटासारखा उंचवटा असून, हे तिघे पाण्यातून चालत त्या उंचवट्यावर चढले. तेथे सेल्फी काढत असताना अचानक एकाचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने त्याचा हात धरला, मात्र तोही खाली ओढला जाऊ लागला. शेवटी तिसऱ्या मित्रानेही त्यांना वाचवण्यासाठी हात पुढे केला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही ३० फूट खोल पाण्यात बुडाले.

 

​हा संपूर्ण प्रकार जवळच असलेल्या एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आला. त्याने तातडीने खदाणीच्या दिशेने धाव घेतली, तर दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने तत्परता दाखवत ‘११२’ क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. ​

 

घटनेची माहिती मिळताच देवळी येथील स्थानिक नागरिक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, नायब तहसीलदार सी. यू. पाटील, शहर तलाठी अशपाक पिंजारी आणि पोलीस कर्मचारी गणेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

 

मोठ्या प्रयत्नांनंतर देवळी येथील दीपक मोरे या युवकाने पाण्यात उडी मारून तिन्ही मुलांना बाहेर काढले. मात्र, दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता आणि तिन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. ​त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले, या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर परिसरावर आणि सिंधी कॉलनीवर शोककळा पसरली आहे.


 

Tags: Amalner

ताज्या बातम्या

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
जळगाव जिल्हा

सेल्फीने घेतला जीव; खदाणीतील ३० फूट खोल पाण्यात बुडून ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

July 8, 2026
१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार
आरोग्य

१० वर्षीय बालिकेच्या डायबेटिक किटोअ‍ॅसिडोसिसवर यशस्वी उपचार

July 7, 2026
निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक
जळगाव जिल्हा

निष्काळजी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा; ​रस्त्यांच्या दुरवस्थेवरून उपमहापौर आणि स्थायी सभापती आक्रमक

July 7, 2026
जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग
क्रिडा

जळगाव जिल्हा निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात; १८३ खेळाडूंचा सहभाग

July 7, 2026
अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!
गुन्हे

अजंदा रेल्वे पुलाजवळ लूटमार करणाऱ्या टोळीला २४ तासांत ठोकल्या बेड्या!

July 7, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!
गुन्हे

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई: ८ गुन्ह्यांमधील १ कोटी ८६ लाखांचा गांजा नष्ट!

July 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group