जळगाव, (प्रतिनिधी) : ‘रयतेचे राजे’ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, १९ फेब्रुवारी रोजी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे जळगाव येथे महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या आदर्श विचारांवर चालण्याचा निर्धार सर्व पत्रकारांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी आणि महासचिव भगवान सोनार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित न ठेवता, ते प्रत्यक्ष जीवनात आणि पत्रकारितेत अंमलात आणण्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अभिवादन प्रसंगानंतर उपस्थित पत्रकारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पाटील, प्रसिद्धी प्रमुख विश्वजीत चौधरी, योगेश चौधरी, योगेश सुने, ज्येष्ठ पत्रकार लालचंद अहिरे, विकास चव्हाण, संधिपाल वानखेडे, हेमंत शर्मा, विलास सोनार, मनोज जोगी, किशोर शिंपी, मीनाक्षी चौधरी, मुजम्मिल सैय्यद यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.







