• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित ; आचारसंहिता लागू

२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबर ला निकाल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 15, 2024
in Uncategorized
0
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित ; आचारसंहिता लागू

नवी दिल्ली, (वृत्तसेवा) : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवार दि. १५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेत, त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड येथील निवडणुकांची घोषणा केली. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक २३ नोव्हेंबरला होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्तांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकारांना माहिती दिली. आम्ही नुकताच महाराष्ट्र आणि झारखंड येथील दौरा केला. तेथील निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. येथील माहिती जाणून घेतली.(केपी) महाराष्ट्र राज्यात ९ कोटी ५८ लाख मतदार आहेत. त्यामध्ये पुरुष ४ कोटी ६६ लाख महिला, महिला ४ कोटी ६४ लाख, तृतीयपंथी ५६ हजार असे मतदार आहेत. राज्यभरात १८६ मतदान केंद्र आहेत. दिनांक २६ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे.

वय वर्ष ८५ वरील जेष्ठ नागरिकांना राहत्या घरून मतदान करता येणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना वृत्तपत्रात माहिती द्यावी लागणार आहे. पूर्ण मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. राज्यभरात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. अर्ज २२ ऑक्टोबर पासून घेण्यास सुरुवात होणार आहे. (केपी)अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर राहील. अर्जांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर आहे.

दरम्यान निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व पक्षांची आता एकच धावपळ उडाली असून पक्षांचे चिन्ह आणि पक्षांच्या नेत्यांचे बॅनर खाली घेण्यासाठी आता सुरुवात करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon #maharashtraElectionmaharashtra
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ.अब्दुल कलाम पुस्तक पेढी चे उद्घाटन

संत ज्ञानेश्वर विद्यालयात डॉ.अब्दुल कलाम पुस्तक पेढी चे उद्घाटन

ताज्या बातम्या

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक
गुन्हे

भुसावळातील चार महिन्यांपूर्वीच्या मारहाण प्रकरणात वाढीव कलमे; दोघांना अटक

August 15, 2026
समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

समाजातील प्रत्येक घटकाचा समतोल विकास हेच शासनाचे ध्येय — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 15, 2026
एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी
खान्देश

एमपीडीए : सराईत गुन्हेगार तन्वीर ऊर्फ तन्याची येरवडा कारागृहात रवानगी

August 15, 2026
शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली
जळगाव जिल्हा

शहीद हुतात्म्यांना मुकुंद गोसावी यांची रक्तदानाने आदरांजली

August 15, 2026
स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन
जळगाव जिल्हा

स्वच्छ, हरित व समृद्ध जळगाव घडवण्यासाठी नागरिकांच्या सहभागाचे महापौरांचे आवाहन

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add