जळगाव, दि. 27 – केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज समविचारी पक्षांच्यावतीने देशभरात ‘भारत बंद’ पुकारण्यात आला होता. दरम्यान सोमवारी जळगाव शहरात देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत नागरिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी या बंद मध्ये आपला सहभाग नोंदवला.
यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष संदीप पाटील, माजी खासदार डाॅ. उल्हास पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान आंदोलकांनी व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर, थोड्याच वेळात व्यापाऱ्यांनी पुन्हा आपली दुकाने सुरू केली. त्यामुळे या बंदला जळगावात प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.
पहा.. व्हिडिओ