जळगाव, दि. 15- ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना राज्यातील सहा जिल्ह्यात होत असलेल्या निवडणुका पुढे घेण्यात याव्या या मागणीसाठी बुधवारी भाजपतर्फे राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले.
दरम्यान जळगावात भाजपा ओबीसी मोर्चा, महानगर आणि जिल्हा ग्रामीणतर्फे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस भारती सोनवणे, ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष जयेश भावसार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी उपस्थित महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा उज्वला बेंडाळे, महानगर चिटणीस राहुल वाघ, नगरसेवक राजेंद्र मराठे, महेश चौधरी, मनोज काळे, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी मोर्चा महिला अध्यक्षा रेखा पाटील, महिला मोर्चा दिप्ती चिरमाडे, महिला सरचिटणीस रेखा वर्मा, क्रीडा आघाडीचे अरुण श्रीखंडे, ओबीसी उपाध्यक्षा तृप्ती पाटील, चंदु महाले, विजय बारी, शांताराम गावंडे, अमित देशपांडे, युवा मोर्चाचे शुभम बावा, युवा मोर्चाचे सरचिटणीस मिलींद चौधरी, जितेंद्र चौथे, सचिन बाविस्कर, प्रथम पाटील, रितेश सोनवणे यांच्या सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.