जळगाव, दि.१८ – मेहरूण येथील साईबाबा मंदिराच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त २३ जानेवारी ते २५ जानेवारी रोजी बीड येथील साई गोपाल देशमुख यांच्या सुमधुर वाणीतून साई कथेचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे.
कथेच्या कार्यक्रमाची वेळ रात्री ८.३० ते ११.३० वाजे पर्यंत असून २५ जानेवारी रोजी ११ वाजता महाआरती होणार आहे. यानंतर ११ ते ३ यावेळेत महाप्रसाद राहील. या साई कथेसाठी परिसरातील नागरिक भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती द्यावी, असे आवाहन माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.