जळगाव, दि. १६ – देशाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची गाठ बांधून भविष्यातील मार्गक्रमण करावे यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्णत्वास येईल. विद्यार्थ्यांनी मेहनत घेण्याची गरज आई- वडिलांच्या उद्धारासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्टा करून संघर्ष करावा तेव्हाच शिक्षणात यश अटळ असल्याचे प्रतिपादन शहराच्या महापौर जयश्री महाजन यांनी केले. त्या पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
या कार्यक्रमात एकूण ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पत्रकार कमलेश देवरे मित्रपरिवार व संकल्प दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने जैन उद्योग समूहाच्या सहकार्याने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये तसेच पाल्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, नगरसेवक मुकुंद सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय चौधरी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण सपकाळे, पोलीस निरीक्षक परदेशी, सामाजिक कार्यकर्ते मंगला देवरे, अयाज मोहसिन आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत भारत देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश माळी, तुषार भामरे, चेतन वाणी, प्रभाकर महाले, हर्षल चौधरी, गणेश देवरे, श्रीकांत चौधरी, जय महाले, श्रीकांत चौधरी, शुभम देवरे, सागर जोशी आदींनी परिश्रम घेतले.