भडगाव | तालुक्यातील कजगाव येथे शेतकऱ्याच्या शेतात चार एकर परिसरातील बाजरी पीक डुकरांनी फस्त केल्याचा प्रकार घडलायं.
त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. एकीकडे पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे. त्यात डुकरांकडून होणारा उपद्रव ही नित्याचीच बाब झाली आहे. तरी संबंधित विभागाने डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी भोरटेक व कजगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.