• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

१८ व्या बहिणाबाई - सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा जळगावात उत्साह

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
ग्रामीण बोलीभाषेचे संरक्षण ग्रामीण साहित्यच करतात – संमेलनाध्यक्ष डॉ. फुला बागूल

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरी लोक बोलीभाषा बोलण्यास संकोच करतात, त्यामुळे ग्रामीण लोकच बोलीभाषेचे खरे तारणहार आहेत, असे प्रतिपादन १८ व्या बहिणाबाई – सोपानदेव चौधरी खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. फुला बागूल यांनी केले. पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अर्पण सेवा ट्रस्ट आणि अन्य संस्थांच्या वतीने आयोजित हे संमेलन जळगाव येथील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात १३ जुलै रोजी मोठ्या उत्साहात पार पडले.

संमेलनाचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरविंद नारखेडे यांना ‘बहिणाबाई – सोपानदेव चौधरी- मालतीकांत जीवनगौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. तसेच, त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. खा. स्मिता वाघ यांनी अहिराणी भाषेला पुढे आणण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर आमदार सुरेश भोळे यांनी शिक्षण कितीही घेतले तरी आपली संस्कृती जोपासणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

संमेलनात ‘आणि ‘ती’ लिहिती झाली…’, ‘कथाकथन’ आणि ‘बालकांचे भावविश्व आणि साहित्य सहवास’ या विषयांवर विविध परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. या सत्रांमध्ये संध्या महाजन, पोर्णिमा मोरे, प्रा. गोपीचंद धनगर, संस्कृती पवनीकर, जयश्री काळवीट, सुधीलकुमार शिंदे आणि माया धुप्पड अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.

कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली खान्देशातील अनेक कवी-कवयित्रींनी विविध विषयांवर कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. संमेलनात मराठी भाषेला महत्त्व देणे, नवीन ग्रंथालयांना मान्यता देणे, बोलीभाषा विकास संस्था स्थापन करणे आणि साहित्यिक पुरस्कारांची संख्या वाढवणे यांसारखे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विलास नारखेडे आणि त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले.


 

Next Post
बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरी करणारा जळगावचा चोरटा जेरबंद

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह
जळगाव जिल्हा

जळगाव पोलीस दलाची मान उंचावली; ५ अधिकारी व २३ अंमलदारांना ‘डीजी इन्सिग्निया’ सन्मानचिन्ह

May 1, 2026
महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे
जळगाव जिल्हा

महात्मा गांधी हे लाईटहाऊस आहेत- कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

May 1, 2026
डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय
जळगाव जिल्हा

डॉ. अनिल पाटलांचा ’महाराष्ट्र वैद्यकीय परिषद’ निवडणुकीत विक्रमी विजय

April 30, 2026
महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
कृषी

महाडीबीटीद्वारे प्रमाणित बियाणे वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सुरू; शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

April 30, 2026
गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी
गुन्हे

गॅस सिलेंडर चोरणारी टोळी गजाआड; जळगाव पोलीस दलाची धडाकेबाज कामगिरी

April 30, 2026
शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!
जळगाव जिल्हा

शहरातील वीज समस्यांबाबत उपमहापौर आक्रमक; विनापरवाना पोल उभारल्यास खैर नाही!

April 29, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group