जळगाव, दि.१९ – महानगरपालिकेच्या कोट्यातील निधी प्राप्त होवुन सुध्दा रस्त्यांची कामे सुरू होवु शकली नाही. त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते अशी अवस्था शहरात निर्माण झाली असल्याचा आरोप भाजप कडून होत आहे. पावसाळ्यात नवीन रस्त्यांची कामे सुरू करता येणार नसल्याने नागरीकांचे भयानक हाल होत असुन तात्पुरता दिलासा म्हणुन बांधकामाचे वेस्ट मटेरियल, मुरूम किंवा विटांचा कच टाकुन रस्त्यांची दुरूस्ती त्वरीत करावी अशी मागणी सोमवारी निवेदनातुन करण्यात आली.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेवून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याचे डबके साचले असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच परिसरात साचलेल्या पाण्यामुळे डासाचे प्रमाण देखील वाढले असून साथीचे आजार पसरण्यची शक्यता नाकारता येत नाही. तरी त्वरित रस्त्यातील खड्डे बुजवण्यात यावे. अशा मागणीचे निवेदन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त यांना दिले. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, सुरेखा तायडे, गायत्री राणे, दीपमाला काळे, शोभा बारी, नगरसेवक महेश चौधरी, विजय वानखेडे, मयूर कापसे, जितेंद्र मराठे, सुरेश सोनवणे, विजय पाटील, मंडल अध्यक्ष शक्ती महाजन, मोहम्मद नूर, मोर्चा अध्यक्ष लता बाविस्कर, रेखा पाटील, शालू जाधव, वर्षा सपकाळे, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, गणेश माळी, प्रशांत सावंत आदी पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.