• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक मृदा दिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 10, 2021
in कृषी
0
जागतिक मृदा दिन साजरा

जळगाव, दि. 10 – सर्वत्र 5 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय स्तरावर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी मृदा या विषयावर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व दैनिक ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमानाने अडावद तालुका चोपडा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मोनिका नाफडे- भावसार व साहाय्यक प्राध्यापक निलेश भागवत सदार यांनी मार्गदर्शन केले. सोबत Agrone चे अधिकारी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अडावद बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख होते. प्रा. निलेश सदार यांनी शेतकऱ्यांना जमीन सुपीकते बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कार्बन हा जमिनीचा आत्मा आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहे, त्याचे कारण म्हणजे रासायनिक खतांचा वापर, जमिनीमध्ये असलेले कमी सेंद्रिय कर्ब (0.3 ते 0.6), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन न करणे, पिकाची फेरपालट न करणे, जमिनीची धूप होणे इत्यादी कारणे ही जमीन सुपीकता कमी होण्यासाठी आहेत. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा समतोल वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, हिरवळीच्या खताचा वापर करणे, जमिनीमध्ये शेणखत ,गांडूळ खत, जैविक खतांचा, वापर करणे आता गरजेचे बनलेल आहे.

प्रा. मोनिका नाफडे – भावसार मॅडम म्हणाल्या जमिनीची सुपीकता कशी आहे हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीचे मृदा पत्रिका तर जवळ बाळगणे गरजेचे आहे. व त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घ्यावा. माती परीक्षण व्यवस्था डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे करण्यात आली आहे. माती मध्ये प्रथम व दुय्यम अन्नद्रव्य बरोबर सुक्षम अन्नद्रव्यांची गरज असते शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

माती परीक्षण बरोबरच पाणी परीक्षण करून त्यामधील क्षारतां, सामू, सोडियम कॅल्शियम, इत्यादी पाण्याच्या गुणधर्मानुसार शेतीला पाणी देण्याची गरज आहे. अन्यथा जमिनीत चोपण बनतील. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असणे म्हणजे जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.


 

Next Post
जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

ताज्या बातम्या

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद
खान्देश

समता नगरात ललितकुमार घोगले आणि सुरेश पवारांचे जंगी स्वागत; महिलांकडून औक्षण तर ज्येष्ठांचे आशीर्वाद

January 12, 2026
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात
खान्देश

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली; जळगावात आमदार राजूमामा भोळेंचा घणाघात

January 11, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group