• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जागतिक मृदा दिन साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 10, 2021
in कृषी
0
जागतिक मृदा दिन साजरा

जळगाव, दि. 10 – सर्वत्र 5 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय स्तरावर जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी मृदा या विषयावर डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय व दैनिक ॲग्रोवन यांच्या संयुक्त विद्यमानाने अडावद तालुका चोपडा येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मोनिका नाफडे- भावसार व साहाय्यक प्राध्यापक निलेश भागवत सदार यांनी मार्गदर्शन केले. सोबत Agrone चे अधिकारी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अडावद बाजार समितीचे सभापती दिनकर देशमुख होते. प्रा. निलेश सदार यांनी शेतकऱ्यांना जमीन सुपीकते बाबत मार्गदर्शन करताना सांगितले की, जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कार्बन हा जमिनीचा आत्मा आहे. जमिनीची सुपीकता कमी होत आहे, त्याचे कारण म्हणजे रासायनिक खतांचा वापर, जमिनीमध्ये असलेले कमी सेंद्रिय कर्ब (0.3 ते 0.6), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन न करणे, पिकाची फेरपालट न करणे, जमिनीची धूप होणे इत्यादी कारणे ही जमीन सुपीकता कमी होण्यासाठी आहेत. जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खतांचा समतोल वापर करणे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे, हिरवळीच्या खताचा वापर करणे, जमिनीमध्ये शेणखत ,गांडूळ खत, जैविक खतांचा, वापर करणे आता गरजेचे बनलेल आहे.

प्रा. मोनिका नाफडे – भावसार मॅडम म्हणाल्या जमिनीची सुपीकता कशी आहे हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीचे मृदा पत्रिका तर जवळ बाळगणे गरजेचे आहे. व त्यासाठी माती परीक्षण करणे गरजेचे आहे. माती परीक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता पुढाकार घ्यावा. माती परीक्षण व्यवस्था डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे करण्यात आली आहे. माती मध्ये प्रथम व दुय्यम अन्नद्रव्य बरोबर सुक्षम अन्नद्रव्यांची गरज असते शेतकरी त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

माती परीक्षण बरोबरच पाणी परीक्षण करून त्यामधील क्षारतां, सामू, सोडियम कॅल्शियम, इत्यादी पाण्याच्या गुणधर्मानुसार शेतीला पाणी देण्याची गरज आहे. अन्यथा जमिनीत चोपण बनतील. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म चांगले असणे म्हणजे जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे.


 

Next Post
जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

जावायाला मुलगा मानून करून दिला दुसरा विवाह ! 

ताज्या बातम्या

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group