• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

उमुख्यमांत्री अजित पवारांनी बारामती विधानसभा निवडणूक न लढण्याचे दिले संकेत ?

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
उमुख्यमांत्री अजित पवारांनी बारामती विधानसभा निवडणूक न लढण्याचे दिले संकेत ?

मुंबई (वृत्तसंस्था ) : उपमुख्यमंत्री आणि बारामती विधानसभेचे विद्यमान आमदार अजित पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याची थेट संकेत दिले आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

तसेच जो कोणी दुसरा आमदार होईल त्याची आणि माझ्या कामाची तुलना करा असं अजित पवारांनी म्हंटल आहे. आज बारामतीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी आपल्या भाषणातून खळबळ उडवून दिली आहे. तसेच इतकी विकासकामे करूनही बारामती लोकसभेत आमचा पराभव झाला अशी खंतही अजित पवारांनी मांडली.

अजित पवार म्हणाले, आपण लाखोंच्या मतांनी निवडून येणारी माणसे आहोत. मी आता ६५ वर्षांचा झालो आहे. मी समाधानी आहे. मात्र जेथे पिकते तेथे विकत नाही. त्यामुळे बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. त्यानंतर १९९१ ते २०२४ च्या काळात माझ्या कारकिर्दीची आणि त्याच्या कारकिर्दीची तुलना करा. बारामतीकराना सगळं काही न मागता मिळालं. न सांगता रस्ता होतोय, न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होतात, आजही कितीतरी कोटींच्या योजनांची कामं सुरु आहेत. यापूर्वी बारामती तालुक्यातील रस्ते कसे होते. आता कसे आहेत? असा सवालही अजित पवारांनी केला.

अजित पवार पुढे म्हणाले, बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. काही चूकत असेल तर मला सांगा. महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी बारामतीत झाली. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. मला एका गोष्टीची जाणीव आहे, कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्ष चालतो. कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो. त्या कण्यानं काम नाही केलं तर गडबड होते हे मान्य केलं पाहिजे. कोणतीही निवडणूक असो, त्या निवडणुतील यश हे कार्यकर्त्यांच्या जिवावर अवलंबून असते.


 

Tags: ajit pawarNcpvidhansabha election
Next Post
जळगावातून २८ वर्षीय तरुण बेपत्ता

जळगावातून २८ वर्षीय तरुण बेपत्ता

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add