• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2021
in जळगाव जिल्हा
0
मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सोमवारी भारत बंदचे आवाहन

जळगांव, दि. 25 – मोदी सरकारच्या धोरणा विरोधात राजकीय पक्ष; संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी भारत बंदच्या आवाहनाला प्रतिसाददेत संयुक्त किसान मोर्चाने जळगांव जिल्हा बंदची हाक दिली आहे. राज्यात हा बंद यशस्वी करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिट पक्ष आदी राजकीय पक्ष व सर्व पुरोगामी संघटनांनी बंदचे आवाहन केलेले आहे.

जनविरोधी व कॉर्पोरेट धार्जिणे ३ कृषी कायदे व ४ श्रम संहिता रद्द करा, विज दुरुस्ती विधेयक मागे घ्या, संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीड पट हमी भाव शेतकऱ्याना मिळावा यासाठी केंद्रीय कायदा करा, खाजगीकरणाचे धोरण बंद करा, डिझेल, पेट्रोल, गॅस इत्यादीचे भाव वाढ कमी करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आपणही जळगांव जिल्हा बंद चे आवाहन केलेले आहे.

तेव्हा शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, शेतमजुर, कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक, महिला आदींनी मोदी सरकारच्या विरोधात बंद पुकारलेला आहे. तेव्हा जळगांव जिल्ह्यातील जनतेने या भारत बंद मध्ये स्वयंपूर्तीने सहभाग घ्यावा असे आवाहन महाविकास आघाडी, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा,  माकप, भाकप, प्रहार जनशक्ती पक्ष, छावा मराठा युवा महासंघ, संविधान जागर समिती, पुरोगामी संघटनांनी केलेली आहे.

मुकुंद सपकाळे -प्रदेशाध्यक्ष -महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, अशोक लाडवंजारी, राजू मोरे, अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ, संविधान जागर समिती संयोजक-भारत ससाणे, कादरीया फाऊंडेशन- फारुख कादरी, कॉ.विजय पवार, निलेश बोरा- युवक अध्यक्ष- प्रहार जनशक्ती पक्ष आदींनी भारत बंदचे आवाहन केले आहे.

Next Post
सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

सूरमाज फाउंडेशन तर्फे IAS झालेल्या गौरव साळुंखे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर
जळगाव जिल्हा

अल्पसंख्यांक समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबिर

June 2, 2023
उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद
कृषी

उच्च तंत्रज्ञानामुळेच शाश्वत शेतीचा मार्ग; शेतकऱ्यांशी फालीच्या विद्यार्थ्यांचा सुसंवाद

June 1, 2023
महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !
आरोग्य

महिलेच्या पोटातून काढला साडेसात किलोचा गोळा !

June 1, 2023
निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या
जळगाव जिल्हा

निर्माल्य आता घंटागाडीत नव्हे तर निर्माल्य संकलन वाहनात द्या

May 31, 2023
कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन
कृषी

कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक म्हणजेच ‘फाली’च्या ९ व्या संमेलनाचे आयोजन

May 27, 2023
जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनचे ३१ मार्च २०२३ ला संपणाऱ्या वर्षाचे एकल आणि एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

May 27, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.