जळगाव, दि.२८ – तालुक्यातील रामदेववाडी येथे झालेल्या अपघातात चार व्यक्ती मृत्युमुखी पडले होते १७ ते १८ दिवस झाल्यानंतर ही पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक केली नव्हती दिनांक २० मे २०२४ रोजी मुंबई येथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना आ. एकनाथराव खडसे सदर घटनेबाबत निवेदन देऊन आरोपींना त्वरित अटक करा अशी मागणी केली होती त्यानंतर दोन आरोपींना व नंतर एक आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली.
परंतु पोलीस प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करीत नाही, काही आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आ. खडसे यांनी केलायं. दरम्यान आरोपींना अटक व्हावी, सदर प्रकरणाची संपूर्ण सखोल चौकशी होऊन मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदद लवकरात लवकर मिळावी यासाठी माजी मंत्री आ. खडसे यांनी २८ मे २०२४ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार होते.
मात्र जळगाव शहरात उन्हाचा पारा वाढत चाललेला असल्याने व जिल्ह्यात तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांचे कडून १४४ कलम लागू करण्यात आल्याने मृतांच्या नातेवाईकांचे व समाज बांधवांचे व समर्थकांचे हाल होऊ नये याकरिता है ठिय्या आंदोलन तूर्त स्थगित कले. मात्र जनजीवन सुरळीत झाल्यानंतर व परिस्थितीत बदल झाल्यानंतर या दुर्घटनेबाबत पुढील काळात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी कळवले आहे.