• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्राम संवाद सायकल यात्रा समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम.. – डॉ. के. बी. पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या सायकल यात्रेचा समारोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 11, 2023
in जळगाव जिल्हा
0
ग्राम संवाद सायकल यात्रा समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम.. – डॉ. के. बी. पाटील

जळगाव, दि.११ – महात्मा गांधींनी आपल्या जीवनात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी कार्य केले व तेच काम गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने काढलेल्या ग्राम संवाद सायकल यात्रेने केले आहे. सायकल यात्रा हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असून यात्रेच्या संपर्कात येणाऱ्या व सहभागी असणाऱ्या सर्वांसाठी ती लाभदायक आहे. अशा प्रकारच्या उपक्रमाची संख्या वाढली पाहिजे असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. के. बी. पाटील यांनी केले. ग्राम संवाद सायकल यात्रेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते अब्दुलभाई, प्रा. डॉ. अश्विन झाला व यात्रा समन्वयक गिरीश कुलकर्णी उपस्थितीत होते.

कार्यक्रमाची सुरुवात अरमान आंगरा यांच्या प्रार्थना व भजनाने झाली. त्यानंतर सायकल यात्रेचे सादरीकरण करण्यात आले. सायकल यात्रेत सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, श्रीराम खलसे, मारिया सिसिलिया, विशाल टेकावडे, आकाश थिटे, सुभाष कासदेकर, अमनकुमार वर्मा, काळूभाई मायडा, प्रशांत सूर्यवंशी, चंद्रकांत चौधरी, विक्रम अस्वार, भिका पाटील, धनराज पाटील, वाल्मिक सैंदाणे यांचा सहभाग होता.

खान्देशी लोकांचे प्रेम, येथील संस्कृती, आदरातिथ्य व खाद्य पदार्थ यांनी आम्हास आनंद दिल्याचेही त्यांनी म्हटले. व्यसनाधीनतेची वाढती समस्या तसेच शाळांमधील शिक्षण व स्वच्छता याबाबत विशेष कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अब्दुलभाई यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व सहभागींना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तिपत्रके देण्यात आली. डॉ. निर्मला झाला यांनी आभार मानले. गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, नितीन चोपडा, संतोष भिंताडे, हेमंत बेलसरे, चंद्रशेखर पाटील, अशोक चौधरी, तुषार बुंदे, योगेश संधानशीवे यांची उपस्थिती होती.


 

Next Post
शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करावे – अनिल जैन

शेतकऱ्यांसाठी एकत्रितपणे काम करावे - अनिल जैन

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘मालमत्ता कर तक्रार निवारण विशेष सप्ताह’ राबवा; उपमहापौर यांची आयुक्तांकडे मागणी
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘मालमत्ता कर तक्रार निवारण विशेष सप्ताह’ राबवा; उपमहापौर यांची आयुक्तांकडे मागणी

April 23, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गायन स्पर्धेत बाजी

April 23, 2026
JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

April 22, 2026
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

April 22, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group