• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 2, 2022
in जळगाव जिल्हा
0
सव्वीस वर्षांनंतर राज्यभरातील मित्र आले एकत्र

गजानन पाटील | अमळनेर, दि. ०२ – तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा श्रीक्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरावर निसर्गरम्य वातावरणात नुकताच संपन्न झाला. सन १९९५-९६ च्या दहावी वर्गातील आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी स्नेह मेळाव्यासाठी तब्बल २६ वर्षांनंतर दिवाळीच्या सुट्टीत वेळ काढून एकत्र आले. राज्यातील तसेच राज्याबाहेर नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले सुमारे ७० विद्यार्थी तसेच ५० च्या जवळपास विद्यार्थीनिनी “गेट टूगेदर”या कार्यक्रमात हजेरी लावली.

तब्बल २६ वर्षांनंतर गुरू व शिष्य दिवाळी निमित्ताने एकत्र आल्याने हा स्नेहमेळावा अतिशय उत्साहाच्या श्री क्षेत्र कपिलेश्वर या धार्मिक व पर्यटन स्थळी निसर्गरम्य वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जी. आर. चौधरी हे होते. तर कार्यक्रमाला सेवानिवृत्त शिक्षक देखील उपस्थित होते. चांगल्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचा देखील सत्कार करण्यात आला.

माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश व्यक्त करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी एकेक किस्से, गमती सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत मनोगत व्यक्त केले.

कळमसरे येथील व सद्या नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक असलेले नरेंद्र गणेश चौधरी यांनी उपस्थित शिक्षक व सर्वच मित्र मैत्रिणी यांना आठवण म्हणून श्रींची (गणपती) चांदीची सुबक व आकर्षक मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली. सदरील स्नेहमेळावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र राजपूत, सुदाम कोळी, प्रशांत राजपूत, प्रदीप पाटील, नंदू शर्मा, नरेंद्र चौधरी, नाना महाजन तसेच शिक्षक डी. डी. राजपूत, सूर्यवंशी सर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.राखी पतील यांनी तर सूत्रसंचालन व्ही पी महाजन यांनी केले.

आजारातून जीवदान मिळालेल्या मित्राला आर्थिक मदत..
आपल्याच शाळेतील एक मित्र दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मैत्रिणींना मिळाली. आणि थेट किशोर माळी याचे घर गाठून त्याची विचारपूस करीत त्यास सुमारे पाच हजार रुपयांची आथिर्क मदत केली. मैत्रिणींच्या या अचानक भेटीने किशोर व त्याचे कटुंब भारावून गेले होते.

 


 

Next Post
परिवर्तनतर्फे रंगभूमी दिन साजरा

परिवर्तनतर्फे रंगभूमी दिन साजरा

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add