गजानन पाटील | अमळनेर, दि. २१ – ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय झाल्याने अमळनेर शहरात बुधवारी अमळनेर अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगित केल्यानंतर आरक्षण वाचविण्यासाठी अखील भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान राज्य सरकारने बांठिया आयोग स्थापन केला होता.
मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अखेर सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे २७% राजकीय आरक्षण कायम ठेवण्याचा निर्णय दिल्याने अमळनेर अ.भा महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
यावेळी समता परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. भीमराव महाजन, तालुका अध्यक्ष अमोल माळी, शहराध्यक्ष प्रताप पाटील, माळी समाज अध्यक्ष मनोहर महाजन, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन, नगरसेवक देविदास महाजन, प्रा.नितीन चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, नगरसेवक प्रविण पाठक, माजी नगरसेवक ॲड सुरेश सोनवणे, विक्रांत पाटील, गंगाराम महाजन, ॲड. सुदाम महाजन, राजेंद्र महाजन, गुलाब महाजन, साखरलाल महाजन, शिक्षक संघटनेचे तुषार पाटील, अनिल पाटील, नरेश महाजन, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे सुनिल शिंपी, जाकीर मेवाती, चेतन महाजन, दीपक महाजन, हरीष चौधरी उपस्थित होते.