जळगाव, दि.१५ – राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्ह्यातील आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा नारा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी जळगावात दिला. दरम्यान मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेवते यांच्या वतीने जिल्हा प्रभारी प्राध्यापक विठ्ठल शिंगाडे हे बोलत होते.
यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने उमेदवार दिले जाणार असल्याचे देखील सांगण्यात आले. तसेच जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील जाहीर करण्यात आल्या.
यावेळी व्यासपीठावर पक्षाचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, जिल्हा प्रभारी समाधान पाटील, उत्तर महाराष्ट्र संघटक डॉक्टर प्रेमराज पळशीकर, राजेंद्र पोधारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.