• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 1, 2026
in जळगाव जिल्हा
0
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

मुंबई, विशेष प्रतिनिधी : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन करण्यासाठी २६२ गणपती विशेष गाड्यांच्या सेवांची घोषणा केली आहे. यामुळे आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुखद आणि सोयीस्कर होईल.

गणपती विशेष गाड्यांच्या एकूण २६२ फेऱ्यांमध्ये २०० आरक्षित विशेष गाड्या (ज्यामध्ये वातानुकूलित विशेष गाड्या आणि वातानुकूलित, शयनयान व सामान्य डब्यांचे मिश्रण असलेल्या गाड्यांचा समावेश आहे) आणि ६२ अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे. या सेवा मुंबई, पुणे आणि नागपूर येथून कोकण क्षेत्रातील विविध ठिकाणांसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.

२०० आरक्षित विशेष गाड्यांमध्ये सावंतवाडी रोडसाठी ११२ (जाण्या-येण्याच्या) सेवा, रत्नागिरीसाठी ६४ सेवा आणि मडगावसाठी २४ सेवांचा समावेश आहे. दिनांक ९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वे सेवांसाठी आतापर्यंत १,१७,६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे.

या विशेष गाड्या प्रवाशांना प्रवासाचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देतील आणि त्यांना प्रवासाचे नियोजन आगाऊ करण्यास मदत करतील, ज्यामुळे ते आपल्या गावी पोहोचून कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत गणपती उत्सव साजरा करू शकतील.

उत्सवाच्या काळातील गर्दीत प्रवाशांचा आराम आणि सोय सुनिश्चित करण्यासाठी, मध्य रेल्वेने आपल्या नेटवर्कवर अनेक उपाययोजना केल्या आहेत, ज्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
• तिकीट काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विविध स्थानकांवर अतिरिक्त तिकीट खिडक्यांची व्यवस्था.
• गर्दीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी प्रमुख स्थानकांवर प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र.
• विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रवाशांसाठी मोफत पिण्याचे पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांची सुविधा.
• विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांच्या शिस्तबद्ध प्रवेशासाठी रांग व्यवस्थापन प्रणाली, तसेच अतिरिक्त आरपीएफ जवान आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती.
• प्रवाशांची सुरक्षा आणि हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी स्थानकांवरील महत्त्वाच्या ठिकाणी रेल्वे सुरक्षा बल आणि तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची वाढीव उपस्थिती.

शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचण्याचा सल्ला दिला जात आहे. वेळेवर पोहोचल्यास गाडीत चढणे सोपे होईल आणि सर्वांसाठी प्रवास अधिक सुरक्षित व सुखद होईल. गणपती विशेष गाड्यांच्या वेळा, मार्ग आणि थांब्यांबाबतच्या सविस्तर माहितीसाठी, प्रवासी भारतीय रेल्वेच्या चौकशीविषयक संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देऊ शकतात किंवा एनटीइएस ॲपचा वापर करू शकतात. सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे आरक्षण युटीएस प्रणालीद्वारे करता येईल. तिकीट आरक्षणासाठी प्रवासी ‘रेलवन’ ॲप देखील डाउनलोड करू शकतात.
प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टाळण्यासाठी केवळ वैध तिकिटांसह प्रवास करावा आणि सोबत वैध ओळखपत्र ठेवावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून प्रवाशांना करण्यात येत आहे.

गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखद प्रवास सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वे कटिबद्ध आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या विश्वास आणि सहकार्याची दखल घेते; तसेच, प्रवास सुरळीत आणि सुखद होण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आणि गर्दी व्यवस्थापन व सुरक्षिततेविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सर्वांना करत आहे.


 

Next Post
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी 'ॲग्रो इन्फ्रा'च्या संचालकांवर गुन्हा

ताज्या बातम्या

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट
खान्देश

सुप्रीम इंडस्ट्रीजला गोदावरी आयएमआर व डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक भेट

September 12, 2026
कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न
कृषी

कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा संपन्न

September 12, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर
कृषी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी जाहीर

September 12, 2026
राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
जळगाव जिल्हा

राज्यात ‘सेवा संकल्प अभियानाचे १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान आयोजन

September 12, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
जळगाव जिल्हा

सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मंगळवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक

September 12, 2026
१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट
Uncategorized

१२ वर्षीय शाळकरी मुलाचा गळफास घेऊन मृत्यू; टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण अस्पष्ट

September 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add