• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हाय अलर्ट | मन्याड-गिरणा प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 28, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
हाय अलर्ट | मन्याड-गिरणा प्रकल्पांतून पाण्याचा मोठा विसर्ग: नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मन्याड मध्यम प्रकल्प आणि गिरणा मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग लक्षणीयरीत्या वाढवला असून, नदीकाठच्या नागरिकांना ‘हाय अलर्ट’चा इशारा दिला आहे.

मन्याड प्रकल्पातून ३०००० क्युसेक्सपर्यंत विसर्ग..
मन्याड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. मन्याड धरणावरील असलेल्या माणिकपुंज प्रकल्पातून सुमारे २८००० ते ३०००० क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाऊस सुरू असल्याने मन्याड नदीत पाण्याचा मोठा प्रवाह येत आहे.

मन्याड नदीकाठच्या नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी जाण्याचे, तसेच आपले पशुधन, शेतीमधील मोटार पंप, गुरेढोरे आणि चीज वस्तू सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश पाटबंधारे उपविभागाने दिले आहेत. जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.

गिरणा प्रकल्पाचा विसर्ग ५१९९६ क्युसेक्सवर..
पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पात पाण्याची वाढती आवक पाहता, आज दि.२८ रोजी दुपारी ४:०० वाजता विसर्ग आणखी वाढवण्यात आला आहे. गिरणा प्रकल्पाचा विसर्ग ४४५६८ क्युसेक्सवरून वाढवून थेट ५१९९६ क्युसेक्स (१४७१.४९ क्युमेक्स) करण्यात आला आहे.

पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या उपविभागीय अभियंत्यांनी याबाबत माहिती दिली असून, गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे. प्रकल्पामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास किंवा कमी झाल्यास विसर्गामध्ये बदल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात किंवा किनारी जाण्याचे धाडस करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


 

Tags: #Floodingofriversandcanals#Heavyrain
Next Post
पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र अंनिसकडून ‘एक उपवास सहवेदनेचा’ आणि आर्थिक मदत

पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र अंनिसकडून ‘एक उपवास सहवेदनेचा’ आणि आर्थिक मदत

ताज्या बातम्या

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना
गुन्हे

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!
जळगाव जिल्हा

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

April 13, 2026
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती
जळगाव जिल्हा

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group