जळगाव, दि. 19 – साबरमती विकास व नवं निर्माण
विरोधात देशभरातील गांधीवादी लोक एकत्र येऊन एक संदेश यात्रा घेऊन जळगाव येथे आले होते . जळगाव मध्ये शंभु पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी वर प्रेम करणाऱ्या लोकांनी आज सकाळी प्रभात फेरी काढली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून ही प्रभात फेरी नेहरू पुतळा नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून गांधी उद्यान येथे महात्मा गांधीच्या पुतळ्याला नमन करून संपन्न झाली.
या यात्रेत जलपुरुष राजेंद्रसिंग, गांधी शांती प्रतिष्ठानचे कुमार प्रशांत, बिहार सर्वोदयचे अशोक भारत, राजस्थानच्या आशा बोथरा, नई तालीमचे डॉ सुगन बरंठ, साम्ययोग साधनाचे संपादक दाणी या सह 50 गांधीवादी कार्यकर्ते सामील झाले होते .