• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे.. – साईगोपालजी महाराज

मेहरूण येथे "दरबार मेरे साई का" साईकथेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 24, 2023
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे.. – साईगोपालजी महाराज

जळगाव, दि.२४ – आपल्या देशात अनेक मतभेद, जातीभेद, धर्मभेद, व्यक्तीभेद असे भेद आहेत, परंतु हे भेद न मानता आपण सर्वांनी एक रहावे व वागावे. कोणीही कधीही कोणाला फसवू नये. प्रत्येकाने आपले आयुष्य नीतिमत्तेने जगले पाहिजे, असे मार्गदर्शन बीड येथील कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज यांनी जळगावात केले.

मेहरूण येथील श्री साईबाबा मंदिराच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्ताने “दरबार मेरे साई का” या चार दिवसीय साईकथेचे २२ ते २५ जानेवारी दरम्यान संध्याकाळी ७.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज यांनी कथा सुश्राव्य केली.

सुरुवातीला मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीला आणि प्रतिमेला महाराजांनी माल्यार्पण करून पूजन केले. प्रस्तावनेतून नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मंदिराविषयीची माहिती देऊन साईकथेविषयी माहिती दिली. त्यानंतर कथेस महाराजांनी प्रारंभ केला. कथेत राज सिंधी व भूषण सोनार यांनी “भर दो झोली मेरी या मोहम्मद” हि कव्वाली तर ‘गणेश वंदना’ हि शुभम बोऱ्हाडे यांनी सादर केली. “गोंधळ” भूषण सोनार यांनी तर “आप मान जाओ साई” हा मुजरा शशिकांत सरोदे यांनी सादर केला.

कथाकार साईगोपालजी देशमुख महाराज म्हणाले की, साईबाबा सर्वांना फार आवडायचे. बाबांमध्ये व मुलांमध्ये अतिशय जवळीकतेच नात निर्माण होत असे. बाबा म्हणत ‘मुलांना शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे. कमीत कमी दिवसाकाठी एखाद्याच्या तरी उपयोगाला पडा व मदत करा, असा संदेश साईबाबा द्यायचे. गरीबी ही कायम नसते आणि श्रीमंती टिकून राहत नाही. असा भेदभाव आपण करू नये. कोणीही माणूस उच्च व निच नसतो. सर्वजण सारखे असतात. असे साईबाबांसह संतांनी सांगितले आहे, असेही महाराज म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील माजी सेवानिवृत्त न्यायाधीश किशोर देशमुख उपस्थित होते. साईकथा दररोज संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होते. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी असे आवाहन स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.

 


Next Post
३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धांचे जळगावात आयोजन 

३२ वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ मुलं व मुली तायक्वांडो स्पर्धांचे जळगावात आयोजन 

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group