भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात आयोजित या सोहळ्यात करणी सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना दामोदर राजपूत म्हणाले की, “आजच्या काळात केवळ महाराजांचा जयघोष करून चालणार नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या घराघरात शिवाजी राजे घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”
या सोहळ्याला करणी सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिका पाटील, जिल्हा सचिव मीना राजपूत, ज्येष्ठ समाजसेवक दिलीपसिंग पाटील, आनंदा पाटील, सुनील पाटील, दलजीत चौधरी, प्रशांत ठाकूर, चंदू चौहान, पवन मेहरा, भूषण राजपूत, गणेश राजपूत, वैशाली सावकारे, संध्या चौधरी, विजय राजपूत, तालुका अध्यक्षा कविता राजपूत, प्रमिला राजपूत, भाग्यश्री राजपूत, सविता राजपूत, संगीता राजपूत, प्रियंका राजपूत, सविता मोरे, अर्चना राजपूत, प्रतीक्षा राजपूत, श्रद्धा राजपूत, उज्वला राजपूत, गायत्री राजपूत, सपना राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या चरणी वंदन केले. या उत्साही सोहळ्यामुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.







