• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ.. – आ. सत्यजित तांबे

पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सची सांगता

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 6, 2024
in जळगाव जिल्हा
0
युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ.. – आ. सत्यजित तांबे

जळगाव, दि.०६ (प्रतिनिधी) : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा विचार निर्भयता आणि नैतिकता शिकवतो. हा विचार घेऊन युवकांनी राष्ट्रबांधणीसाठी काम करावे. गांधी आणि नेहरूंच्या विचारावर देश उभा आहे . हा विचार जोपासणारी जयहिंद लोकचळवळ ही राज्यभरातील तरुणांसाठी मोठे व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन युवक आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.

जैन हिल येथील गांधी तीर्थ येथे जयहिंद लोकचळवळ व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या जयहिंद ग्लोबल कॉन्फरन्सच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर इंडोनेशियाचे गांधीवादी विचारवंत पद्मश्री इंद्रा उदयन, संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सचिन इटकर, संकेत मुनोत, गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन ,डॉ. आश्विन झाला, डॉ रवींद्र वानखेडे, दुर्गाताई तांबे, शैलेंद्र खडके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सुदृढ निरोगी समाज बनवण्यासाठी १९९८ मध्ये जय हिंद लोकचळवळीची स्थापना झाली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात, राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे यांनी माणसांना जोडण्याचे संस्कार दिले यातून मी युवकांना जोडत गेलो. आणि आज ही चळवळ राज्यभर पोहोचली आहे. समाजामध्ये अंधश्रद्धा, जातीभेद, अस्वच्छता रूढी परंपरा यांचे मोठे प्राबल्य असून या सर्वांच्या विरुद्ध लढण्यासाठी रचनात्मक विचार जय हिंद च्या माध्यमातून दिले जात आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नैतिकतेचा विचार माणसाला निर्भय बनवतो. गांधी व नेहरूंच्या विचारावर हा देश उभा असून गांधींनी भारताला भारत पण दिले.

छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा स्वराज्य व रयतेच्या कल्याणाचा एकच विचार असून सर्वधर्मसमभाव जोपासत शेतकरी व गोरगरिबांच्या कल्याणाचे राज्य निर्माण व्हावे हा विचार त्यांचा आहे. या विचारातून या तरुणांनी काम असे आव्हान करताना विविध कलागुण व करिअरच्या दृष्टीने राज्यभरातील युवकांसाठी जय हिंद लोकचळवळ हे मोठे आश्वासक व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले.

तर पद्मश्री इंद्रा उदय म्हणाले की, गांधी विचार सर्व दूर पोहोचवणारी ही जय हिंद लोक चळवळ असून देश प्रेमाने भारवलेले तरुण येथून निर्माण होत आहेत. भारत व इंडोनेशिया मधील संबंध अधिक दृढ करण्याचे काम जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जैन उद्योग समूहाने उभारले गांधी तीर्थ हे सर्वांसाठी ऊर्जा देणारे प्रेरणास्थळ असल्याचे ते म्हणाले. यावेळी प्रमोद चुंचूवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील ३०० युवक व युवती तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक बुलढाणा, अहमदनगर , औरंगाबाद जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


 

Next Post
योग्य स्थळ शोधण्यास वधू वर परिचय मेळाव्याची भूमिका महत्वाची.. – आ. भोळे

योग्य स्थळ शोधण्यास वधू वर परिचय मेळाव्याची भूमिका महत्वाची.. - आ. भोळे

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

ज्येष्ठ नाट्यकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना आदरांजली; शोकसभा आणि आरोग्य शिबिराचे आयोजन

June 29, 2026
मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ
गुन्हे

मंदिराच्या पुजाऱ्याची हल्लेखोरांकडून हत्या; भुसावळात खळबळ

June 29, 2026
उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना
गुन्हे

उसनवारीचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेवर कारमध्ये अतिप्रसंग; जळगावातील धक्कादायक घटना

June 29, 2026
२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!
Uncategorized

२२ चोरीच्या मोटार सायकलींसह ४ जणांना अटक; २५ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त!

June 29, 2026
अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
गुन्हे

अवघ्या ५ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, दोन सराईत चोरट्यांकडून ६३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

June 28, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
महाराष्ट्र

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group