• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले खडसेंनी पत्र

उष्माघातामुळे होणारा मृत्यू नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून पाच लाखाची मदत द्यावी.. - एकनाथराव खडसे

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 18, 2023
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहीले खडसेंनी पत्र

जळगाव, दि. १८ – महाराष्ट्र राज्यात उष्माघात मुळे मृत्यू होण्याच्या घटना वाढत आहेत. दरम्यान उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासनातर्फे आर्थिक मदत मिळणेसाठी तरतूद करावी याबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.

पत्रात लिहिताना त्यांनी, मागील ४ ते ५ दिवसापासून तापमानाचे प्रमाण जास्तच वाढलेले असून, जळगांव जिल्ह्यात तापमानाचा देशात उचांक गाठला आहे. उष्माघाताने जिल्ह्यातील बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असून, काही दिवसापूर्वी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा उल्लेख केला आहे.

त्याचबरोबर उष्माघातापासून संरक्षणासाठी शासनामार्फत वेळोवेळी जनजागृती करून सूचना करण्यात येतात परंतु, शेतकरी, शेत मजूर, बांधकाम मजूर ई. नाईलाजास्तव भर उन्हात आपले काम करावे लागते, व अश्या परिस्थितीत उष्माघाताने मृत्यू होण्याची शक्यता असते. परंतु सदर नागरिकांना शासनामार्फत आर्थिक मदत पुरविण्यात येत नाही अथवा कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त केली.

तरी महाराष्ट्र राज्यात उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून, मृतांच्या परिवारास शासनातर्फे कमीतकमी ५.०० लक्ष रुपये आर्थिक मदत मिळणेसाठी तत्काळ योग्यती तरतूद करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

 


 

Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ संकल्पेत हास्य क्लब सहभाग

ताज्या बातम्या

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add