• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतात अंगावर वीज पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू ! ; जामनेर तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथे शेतात काम करताना अचानक पाऊस सुरु झाला. तेव्हा कोंबड्याना खाद्य टाकण्यास गेलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दि. ११ मे रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. ऐन मातृदिनाच्या दिवशीच महिलेची ५ मुले पोरकी झाली आहे. तर तहसीलदार व अधिकाऱ्यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत मयत महिलेच्या परिवाराला रुपये ४ लाख शासनाच्या वतीने मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

हिराबाई गजानन भिल (वय ३८, रा. बिलवाडी ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या पती, ४ मुली, १ मुलगा यांचेसह बिलवाडी येथील दिलीप हरी भावसार यांच्या शेतशिवारातील घरात राहत होत्या. दोन्ही पती-पत्नी शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, रविवारी दुपारी ४ वाजता जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. पोलीस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात घराजवळ एका झाडाखाली असलेल्या कोंबडीच्या पिल्लाना भर पावसात हिराबाई ह्या अन्न-पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी निंबाच्या झाडावर जोरदार वीज पडली व ती खाली असलेल्या हिराबाई यांच्या अंगावरच कोसळली.

या भयावह घटनेत हिराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ग्रामस्थांनी पहूर येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी महिलेच्या लहान मुलांनी तसेच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या घटनेमुळे बिलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान घटनेबाबत पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी दि. १२ मे रोजी सकाळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पहूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन सानप, मंडळ अधिकारी व इतर अधिकारी यांनी घटनास्थळी पाहणी करून हिराबाई यांच्या परिवाराचे सांत्वन केले. तसेच शासनातर्फे ४ लाख रुपये मिळवून देण्याचे आश्वासन तहसीलदार आगळे यांनी हिराबाई भिल यांच्या परिवाराला दिले आहे.


Next Post
भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

भडगाव नगरपरिषदेच्या विकासकामाचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू !
जळगाव जिल्हा

कौटुंबिक वादातून विवाहितेची आत्महत्या; उपचारादरम्यान मृत्यू !

June 3, 2025
मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाज प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न

June 2, 2025
महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंनिसच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा

June 2, 2025
भर रस्त्यावर प्रसूती प्रकरण: सीईओंच्या कडक भूमिकेने आरोग्य यंत्रणेला नवी दिशा
जळगाव जिल्हा

भर रस्त्यावर प्रसूती प्रकरण: सीईओंच्या कडक भूमिकेने आरोग्य यंत्रणेला नवी दिशा

May 31, 2025
जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान
आरोग्य

जळगावच्या सुजाता बागूल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मान

May 31, 2025
अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत
खान्देश

अनैतिक संबंधातून पत्नीचा खून : सैन्यदलातील क्लार्क पतीसह चौघे अटकेत

May 31, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group