• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार

पत्रकार परिषदेत संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे यांची माहिती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 26, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि २०२३ साली स्थापन झाली आहे. या पार्टीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीतील सर्व २८८ जागा लढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष सपकाळे यांनी गुरुवारी दि. २६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि २०२३ साली स्थापन झाली आहे. या पक्षाचे सर्व जिल्ह्यात कार्यकर्ते आहेत. या पक्षातर्फे गोरगरीब, वंचित, महिला, शेतकरी, बालविकास, रोजगार अशा विविध पातळीवर काम करण्यासाठी धोरण आखण्यात आले आहे. सामान्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि आगामी काळात सक्रिय राहणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रचना करण्यात आली आहे. तसेच, विविध पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकदेखील पुढील काळात केल्या जाणार आहेत.

सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात सुरु झाले आहे. यामुळे राज्यभरात विधानसभेच्या २८८ जागा स्वबळावर लढविण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरु असून स्वबळावर सत्ता येण्यासाठी चाचपणी सुरु करण्यात आली आहे. अद्याप उमेदवारांची घोषणा बाकी असून इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन पक्ष अध्यक्ष संतोष सपकाळे ( ९५२९२४०८७०) यांचेशी थेट संपर्क करावा. तिकिटासाठी होणारा घोडेबाजार या पक्षात नाही. पात्रतेच्या निकषावर उमेदवारी दिली जाणार आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि महाराष्ट्रात एक सक्षम पर्याय उभा करीत आहे. राज्याला पुरोगामी तसेच संत व समाजसुधारकांची परंपरा आहे. मात्र महापुरुषांच्या नावाखाली मोठे राजकारण सत्ताधारी व दोन्ही खेळत आहे. हे खरेतर लांछनास्पद आहे. आजवर अनेक सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. प्रत्येकाने आपली पोळी शेकून घेण्यासाठी सत्तेत काम केले. मात्र महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी हि प्रत्येकाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याकरिता सक्षम पर्याय हा महाराष्ट्र स्वाभिमान पार्टी आता महाराष्ट्रवासियांना उपलब्ध झाला आहे. पार्टीतर्फे उमेदवारी देताना सर्व वर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्याचा व संधी देण्याचा प्रयत्न आहे.

VIDEO


Tags: #political
Next Post
विवाहितेचा प्रेमसंबंधात निर्घृण खून, संशयिताला अटक

विवाहितेचा प्रेमसंबंधात निर्घृण खून, संशयिताला अटक

ताज्या बातम्या

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !
जळगाव जिल्हा

भीषण अपघातात दुचाकीवरील पिता गंभीर जखमी, तर १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

May 8, 2025
कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण
जळगाव जिल्हा

कंपनीच्या प्रवेशद्वारावर हजेरी वरून वाद झाल्याने चौघांची तरुणाला मारहाण

May 6, 2025
छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना
जळगाव जिल्हा

छताला गळफास लावून घेत तरूणाची आत्महत्या ; जळगाव शहरातील घटना

May 6, 2025
ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन
आरोग्य

ज्येष्ठ नागरिकांसाठी ८ ते १६ मे दरम्यान विशेष शिबीराचे आयोजन

May 5, 2025
रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी
जळगाव जिल्हा

रिक्षा अपघातात १२ वर्षीय बालिका ठार, ३ जण जखमी

May 4, 2025
अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक
गुन्हे

अनैतिक संबंधाच्या वादातून झाला तरुणाचा खून ! ; २४ तासाच्या आत चार जणांना अटक

May 4, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group