• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीला पाय ठेवू नये.. ; गोरसेना संघटनेचा इशारा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 21, 2024
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
पंतप्रधान मोदींनी पोहरादेवीला पाय ठेवू नये.. ; गोरसेना संघटनेचा इशारा

जळगाव, दि.२१ (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती, देशभरातील सर्व गोर बंजारा समाजाला एकाच सुचीमध्ये सामाविष्ट करुन अनुसूचित जमातीत सामाविष्ट करावे, नाॅनक्रिमीलीअरची अट रद्द करावी, गोर बोलीला संवैधानीक दर्जा द्यावा, गोर बंजारा समाजातील घुसखोरी थांबवावी यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले होते परंतु पंतप्रधान मोदींनी यापैकी एकही मागणी पुर्ण न करता संत रामराव महाराज यांच्या मागणीला केराची टोपली दाखवल्याचा आरोप करत गोरसेना या सामाजिक संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष प्रा संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत.

गोर बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्यक्षात भेटून समाजाच्या प्रमुख मागण्या मागीतल्या  होत्या व या मागणीला दुजोरा देऊन त्या तात्काळ सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करु असे पंतप्रधान मोदींनी संत रामराव महाराज यांना आश्वाशीत केले होते. मात्र आतापर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

बोगसगिरी हटाव बंजारा बचाव मागणीसाठी गोरसेना अधिकच आक्रमक झाली असून सर्व विमुक्त जाती मधील सर्व समाजघटकांनी उघड पाठिंबा दिलेला आहे. घुसखोरी विरोधात वातावरण तापलेले असतांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवी येथे नंगारा लोकार्पण सोहळ्यासाठी येत आहे या अगोदर नंगारा भवनाच्या भूमीपूजनाच्या व पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महाराष्ट्रातील तमाम मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ज्या मागण्या बंजारा समाजाकडून मांडण्यात आल्या होत्या त्यापैकी एकही मागणी पुर्ण झालेली नसताना पुन्हा त्याच नंगारा भवनाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजकांनी त्याच त्या मागण्यांसाठी तीन तीन कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाजाला राजकारणापुरते वापरले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आता नंगारा पुर्ण झाले असून लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहे. दरम्यान ही शेवटची संधी आहे जर वरील मागणीला हरताळ फासले तर महाराष्ट्र सरकारला येत्या निवडणुकीत घरचा रस्ता गोरसेना दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. यावेळी गोरसेना जिल्हाध्यक्ष अर्जून जाधव, सचिव चेतन जाधव, कैलास जाधव आदी उपस्थित होते.

 


 

Next Post
विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची.. – आ. राजूमामा भोळे

विद्यार्थ्यांची शोधक बुद्धी विकसित होण्यासाठी विज्ञान प्रतिकृती स्पर्धा महत्त्वाची.. - आ. राजूमामा भोळे

ताज्या बातम्या

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
जळगाव जिल्हा

राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

August 12, 2026
संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी
सामाजिक

संत नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात; टाळ-मृदुंगाच्या गजरात निघाली पालखी

August 12, 2026
अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री
जळगाव जिल्हा

अभाविप जळगाव महानगराची नूतन कार्यकारिणी जाहीर; प्रा. डॉ. अमरदीप पाटील अध्यक्ष तर आर्यन भालशंकर मंत्री

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

August 12, 2026
सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर
जळगाव जिल्हा

सिन्नरवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला कारची धडक; अपघातात १२ भाविक जखमी, सहा जणांची प्रकृती गंभीर

August 12, 2026
रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड
जळगाव जिल्हा

रोजगार मेळाव्यात तरुणांना सुवर्ण संधी; ४५ उमेदवारांची झाली निवड

August 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add