जळगाव | दि.३० जुन २०२४ | आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे तालुक्याचे विधान सभा निरीक्षक विजय महाजन व तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली, ती अतिशय चुकीची होती त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच आघाडीतील उमेदवाराचा पराभव झाला असे स्पष्ट आरोप तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभारी यांच्यासमोर मांडले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार २००९ ची निवडणूक वगळता दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून पराभूत झालेला आहे तरी तीन वेळा आघाडीधर्म पाळून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केलेली आहे. तरी यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी यावेळी प्रभारी यांच्या कडे केली.
त्या अनुषंगाने तालुक्याचे प्रभारी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मागील निवडणुकीबाबत व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्वांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेसची नाही असे प्रभारी म्हणाले. आघाडीत राहून जर काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर एकला चलो चा नारा यावेळी देण्यात आला.
सदर बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुभाष सांडू पाटील जळके व जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यापैकी एका व्यक्तीने जळगाव ग्रामीण विधानसभेची उमेदवारी करावी अशी एकमुखाने मागणी करून ठराव पारित करण्यात आला. यावेळी तालुका प्रभारी विजय महाजन, तालुकाध्यक्ष डिगंबर चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सुभाष सांडू पाटील, संदीप वाघ, सुभाष भंगाळे,नरेंद्र सपकाळे, प्रमोद पाटील, विनायक सूर्यवंशी, दिलीप घोलप, अजित मोमीन, मुश्ताक मोमीन, निशा फेगडे यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.