जळगाव, दि.०२ – शहरातील के.बी.एस समाजमंदिर येथे एका लग्न समारंभात वधू वरासह उपस्थित वऱ्हाडींनी मतदानाची शपथ घेतली. देशाची लोकशाही भक्कम व्हावी या उद्देशाने कंजरभाट समाज युवा फाऊंडेशनने पुढाकार घेतला असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान मतदानासाठी जनजागृती करणाऱ्या जळगांव जिल्हा प्रशासनाला कंजरभाट समाज युवा फाऊंडेशन संस्थेने सुद्धा हातभार लावला आहे. आम्ही सुद्धा स्वतः लोकशाहीचे घटक असून मतदान हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. मतदान हा तुमचा अधिकारच नाही तर तुमची जबाबदारी देखील आहे. असे संस्थेचे सचिव राहुल नेतलेकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाप्रसंगी नरेश बागडे यांनी उपस्थित त्यांना शपथ दिली. यावेळी मोहन गारुंगे, राहुल नेतलेकर, विजय अभंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, सचिन बाटूंगे, योगेश बागडे, संदीप गारुंगे, प्रदीप नेतले, पंकज गागडे, निखिल गारुंगे, संदीप बागडे, संतोष रायचंदे, गौतम बागडे, क्रांती बाटूंगे, अभय गारुंगे, अविनाश अभंगे, कार्तिक बाटूंगे, जयेश माछरे, राहुल दहियेकर, गोपाल बाटूंगे, बिरजू नेतलेकर, ज्ञानेश्वर गुमाने, मनोहर अभियेकर, जळगांव, धुळे, नंदुरबार, दोंडाईचा,अमळनेर,नाशिक,संगमनेर, येथील समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.