• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेर येथे तीन दिवसीय ‘परिवर्तन आनंदयात्री महोत्सव’

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 21, 2022
in मनोरंजन
0
जामनेर येथे तीन दिवसीय ‘परिवर्तन आनंदयात्री महोत्सव’

जळगाव, दि.२१ – परिवर्तन जळगाव संस्था सतत नवीन निर्मिती आणि प्रयोगशील संस्था म्हणून महाराष्ट्रात ओळखली जाते. कणकवली, कोल्हापूर, मुंबई, धुळे , पुणे असा महाराष्ट्रभर गाजत असलेला परिवर्तन कला महोत्सव जामनेर शहरात होत आहे. परिवर्तन निर्मित संगीतमय महोत्सव हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. सर्व स्थानिक कलावंताना घेऊन परिवर्तनने केलेली ही निर्मिती खान्देशातील संगीत क्षेत्रातील कलावंताना आत्मविश्वास देणारी आहे.

या महोत्सवाचे आयोजन आनंदयात्री परिवाराने केले असून दि. २३, २४ व २५ सप्टेंबर असे तीन दिवस ‘परिवर्तन आनंदयात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कला महोत्सवाची सुरवात दि. २३ रोजी शुक्रवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता आणि गाण्यांवर आधारित ‘अरे संसार संसार’ या कार्यक्रमाने होणार आहे. संकल्पना विजय जैन यांची तर दिग्दर्शन नारायण बाविस्कर यांचे आहे.

दि.२४ रोजी वारीचा अनुभव देणा-या दि. बा. मोकाशी यांच्या गाजलेल्या ‘पालखी’ कादंबरीचे संगीतमय सादरीकरण होणार आहे. नाट्य रूपांतर शंभु पाटील यांचे असून दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे आहे. कला महोत्सवाचा समारोप ‘गझल -रेगिस्थान से हिंदुस्थान’ तक या कार्यक्रमाने केला जाणार आहे. संकल्पना दिलीप पांढरपट्टे यांची तर दिगदर्शन मंगेश कुलकर्णी यांचे आहे.

या तीनही कार्यक्रमांची निर्मिती परिवर्तन जळगाव संस्थेची असून अशा प्रकारचा परिवर्तनचा महोत्सव जामनेरात दुस-यांदा होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या सभागृहात हा महोत्सव दररोज सायंकाळी ६:३० वा होणार असून महोत्सव तीनही दिवस प्रेक्षकांसाठी खुला असणार आहे.

या महोत्सवासाठी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असून आयोजनासाठी अध्यक्ष डॉ.अमोल सेठ, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर पाटील, खजिनदार आशिष महाजन, सचिव सुहास चौधरी, सहसचिव गणेश राऊत, डॉ राजेश सोनवणे, सुधीर साठे,कडू माळी, नितीन पाटील, डॉ पराग पाटील, अमरीश चौधरी, संकेत पमनाणी, बंडू जोशी आदी प्रयत्नशील आहेत. आनंदयात्री परिवार व परिवर्तन संस्था महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.

Next Post
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात सुसज्ज संगणक कक्षाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन
धार्मिक

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमीत्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

December 1, 2023
‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन
जळगाव जिल्हा

‘आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत मंजूर दवाखाने तातडीने सुरू करण्यासाठी मनसेचे निवेदन

December 1, 2023
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन
जळगाव जिल्हा

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन पुस्तिकेचे प्रकाशन

November 29, 2023
२६/११ मधील वीर शहीदांना जळगावात आदरांजली
जळगाव जिल्हा

२६/११ मधील वीर शहीदांना जळगावात आदरांजली

November 26, 2023
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव जिल्हा

‘विकसित भारत संकल्प यात्रा’ रथाचा खा. उन्मेश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

November 26, 2023
बंदोबस्तात व्यस्त असलेला पोलीस मैदानावर मजबूत.. – पालकमंत्री गुलाबराव पाटील
क्रिडा

बंदोबस्तात व्यस्त असलेला पोलीस मैदानावर मजबूत.. – पालकमंत्री गुलाबराव पाटील

November 26, 2023
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

कॉपी करू नका.