अमळनेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील जळोद येथील एका २९ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संदीप जगन्नाथ कोळी (वय २९,रा.जळोद ता.अमळनेर) हा परिवारासह राहत होता. दि.१० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास बैल बांधण्याचा गोठ्यात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वामन शिवलाल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.