• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर

तरुण वाहून गेल्याची भीती

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 16, 2025
in जळगाव जिल्हा
0
मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर

जळगाव, (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या मुसळधार पावसामुळे गोरक्षगंगा नदीकाठच्या सुमारे १५ गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने गावांमध्ये पाणी शिरले असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत एक २७ वर्षीय तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

गावांमध्ये पाणी शिरले, शेतीचे मोठे नुकसान..
मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून, जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. कुऱ्हा येथील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतीत उभ्या असलेल्या पिकांचे आणि जमिनीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावांमध्येही घरांमध्ये पाणी शिरले असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

२७ वर्षीय युवक पुरात वाहून गेल्याची भीती..
या नैसर्गिक आपत्तीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. काकोडा येथील २७ वर्षीय किरण मधुकर सावळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

प्रशासनाचे मदतकार्य सुरू..
या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ कुऱ्हा गावाकडे धाव घेतली, परंतु धामणगाव-देशकुंडा जवळील नाल्याला पूर आल्याने त्यांचा मार्ग थांबला आणि ते तिथेच अडकून पडले. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत.

बाधित कुटुंबांना मदत, पंचनामे सुरू..
संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी आणि बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने केले आहे.


 

Next Post
अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

June 6, 2026
फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन
कृषी

फालीमुळे कृषी क्षेत्रात दीर्घकालीन बदल घडणार- अथांग जैन

June 5, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन
आरोग्य

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला मिळाले नवजीवन

June 5, 2026
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’
जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

June 4, 2026
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय
जळगाव जिल्हा

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

June 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group