• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बळीराजा स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान

वीस दिवसांपासून नित्य उपक्रम सुरू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2021
in सामाजिक
0
बळीराजा स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान

 

गजानन पाटील | अमळनेर – यावर्षी जळगाव जिल्ह्यासह सह उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट महिना अर्धा झाला तरीही पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान अमळनेर तालुक्यातील वासरे गावातही गावाला पाणी पुरवठा करणारी विहिरीने तळ गाठल्याने पाणी टंचाई जाणवत आहे.

या पार्श्वभूमीवर येथील शेतकरी राजेंद्र शेनपडु पाटील हे स्वताच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने स्वखर्चाने गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून करीत आहे.
येथील गावात पाणी टंचाई जाणवू लागल्याने राजेंद्र पाटील यांनी कळमसरे येथील जय बाबारी भक्त परिवाराचे पाण्याचे टँकर मागवून त्याला स्वमालकीचे ट्रॅक्टर जोडून स्वताच्या मालकीच्या विहिरीतून गावातील प्रत्येक गल्लीत टँकरने पाणी पुरवठा करीत आहेत. यामुळे तात्पुरती का असेना पिण्याच्या पाण्याची सोय होत असून वासरेकरांना दिलासा मिळत आहे.

असा केला जातो पाणी पुरवठा..
राजेंद्र पाटील यांची खेडी रस्त्यावर स्वमालकीची शेती क्षेत्रात विहीर आहे. त्यांनी शेतात बागायती क्षेत्र कमी करून गावात पाणी टंचाई निर्माण झाल्याने दररोज शेतात जाऊन स्वखर्चाने टँकर भरून आणणे आणि गल्लीत उभे करून नळीच्या साहाय्याने प्रत्येक कुटुंबाला पिण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध करून देत आहेत. गेेेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून गावातील प्रत्येक गल्लीत पाणी पुरवठा केला जात आहे.

तालुक्यात पावसाअभावी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून पिके कोमेजली आहेत. मात्र अशाही परिस्थितीत राजेंद्र पाटील गावात टँकरने पाणी पुरवठा करीत असल्याने त्यांच्या या उदात्त हेतूने सामाजिक बांधिलकी जोपासल्याने ग्रामस्थ त्यांचे तोंड भरून कौतुक ही करीत आहेत.


 

Next Post

रानभाजी महोत्सवास नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add