नागपुर, दि.११ – केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केंद्राने ही निर्यातबंदी तत्काळ हटवावी, कांद्याला व सोयाबीनला हमीभाव द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आज सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, आ. सुनील भुसारा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांसह इतर आमदार उपस्थित होते.