• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 15, 2022
in कृषी, जळगाव जिल्हा
0
भारतीय किसान संघातर्फे दिल्ली येथे किसान गर्जना रॅली

जळगाव, दि.१५ – लोकशाही राज्य स्थापन होऊन ७५ वर्षे झाली तरी शेतकऱ्यांना घटनादत्त आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले नाही. यासाठी भारतीय किसान संघ आपल्या स्थापनेपासून शेतमालास संपूर्ण उत्पादन खर्चासह लाभकारी किंमत सरकारकडे मागत असून आजपर्यंत याविषयी अनेक वेळा प्रस्ताव पाठवले गेले, निवेदन दिली, आंदोलने झाली. मात्र तरीही दिलासादायक निर्णय कोणत्याही सरकारने घेतला नाही.

त्यासंदर्भात आता भारतीय किसान संघ १९ डिसेंबर ला आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लीतील रामलिला मैदानावर लाखोंच्या संख्येने शेतकरी देशव्यापी किसान गर्जना रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

महागाईच्या नावाखाली शेतमालाच्या किंमती सातत्याने नियंत्रित ठेवणे, शेतकऱ्याचा उत्पादन खर्च नाही निघाला तरी त्याची पर्वा न करणे, उत्पादकापेक्षा ग्राहकाला झुकते माप देणे, अशा सापत्न वागणुकीमुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढला आहे. सरकारच्या या अन्यायकारक धोरणामुळे कर्जबाजारीपणाची शिक्षा शेतकरी भोगत आहे. शेती कर्ज वाढविणारा व्यवसाय ठरल्याने तरुण पिढी या व्यवसायामध्ये येण्याचे नाकारत आहे. ही देशासाठी भविष्यात अन्नसंकट निर्माण करण्याची धोकादायक घटना ठरू शकते. त्यासाठी देशभरातील लाखो शेतकरी देशाच्या राजधानी दिल्लीतील रामलिला मैदानावर १९ डिसेंबर रोजी किसान गर्जना रॅलीच्या माध्यमातून आक्रोश प्रकट करणार आहेत.

यात प्रामुख्याने पाच मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण उत्पादन खर्चावर आधारित लाभकारी मूल्य मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. सरकार कृषी निविष्ठां जसे खते बियाणे औजारे वरील भरलेला जीएसटी, क्रेडीट इनपुट देणार नसेल तर निविष्ठावर जीएसटी आकारू नये. कारण शेतकरी अन्ननिर्मितीसाठी निविष्ठा वापरतो, तो अंतिम ग्राहक नाही. तसेच किसान सन्मान निधीमध्ये पुरेशी वाढ व्हायला हवी. कारण, आज शेतकऱ्याचे उत्पन्न मजुराच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे.

शेतकरी कुटुंबे कर्जाखाली दबली गेली आहेत. रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति एकराच्या प्रमाणामध्ये डीबीटीद्वारे दिले जायला हवे. विज्ञान संशोधनास आमचा विरोध नाही परंतु, वैज्ञानिक कसोटी, पर्यावरण व मानव सुरक्षा यांना अद्याप पात्र न ठरलेले जनुकीय वाण यांच्या क्षेत्र चाचण्या या त्वरीत थांबवाव्यात. तथापी मुबलक उत्पादन देणाऱ्या सुधारीत, संकरीत, पर्यावरणपुरक वाणांचे संशोधन, संवर्धन व प्रसार करावा आदी मागण्या भारतीय किसान संघातर्फे करण्यात आल्या आहेत.

तरी शेतकन्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यामध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव महाजन, जिल्हामंत्री डॉ. दीपक पाटील यांनी केले आहे.


 

Next Post
‘चार भिंती’ चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक.. – अशोक जैन

'चार भिंती' चित्र प्रदर्शन हे प्रबोधनात्मक.. - अशोक जैन

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group