जळगाव | श्रीराम मंदिर संस्थान पिंप्राळा यांचे मानराज पार्क येथे असलेल्या मैदानाच्या चौफेर नैसर्गिक प्राणवायू देणारे वृक्ष जोपासण्यासाठी पुढाकार घेत भारत विकास परिषदेने ७५ व्या स्वातंत्रदिनानिमित्त पंचवीस रोपांची लागवड केली. गेल्या वर्षी कोविड परिस्थितीत अनेकांना प्राणवायू मुळे प्राण गमवावे लागले. समाजाच्या विकासासाठी सेवाभावी कार्य करणार्या भारत विकास परिषदेने ही हानी भरून काढण्याचा निश्चय केला असून वृक्षारोपण मोहीम हाती घेत ज्येष्ठ व नूतन सदस्यांच्या हस्ते वृक्ष रोपण केले. रोपांच्या संवर्धनासाठी ठिबक सिंचनची नळी लावून दिली. जेणेकरून झाडाला वर्षभर पाणी दिले जाईल. सोबत मोकाट जनावरांपासून झाडांचे संरक्षणार्थ ताराची जाळी लावली.
या झाडांचे पालकत्व परिसरातील रहिवासी असलेले भारत विकास परिषदेचे सचिव उमेश पाटील यांनी घेतले. कार्यक्रमास प्रकल्प प्रमुख तुषार तोतला, अध्यक्ष उज्वल चौधरी, सचिव उमेश पाटील, श्रीराम मंदिर संस्थान पिंप्राळा चे विश्वस्त जगदीश जाखेटे, मिनेश शाह, विठ्ठल काबरा, विशाल देशमुख, महेश जडिये, उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील, संजीव पाटील, रत्नाकर गोरे, दिपक सेठ, रवींद्र लड्ढा, नंदकुमार जैस्वाल, हर्ष खाडिलकर, डॉ. विकास चौधरी, संतोष इंगळे, भारत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, केदारनाथ मुंदडा, प्रशांत गुजराती, राजेश नाईक, दीपक खडके, डॉ. योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते.
सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांनी मातेचे पूजन केले.