अमळनेर, (प्रतिनिधी) : विहिरीजवळ तोल गेल्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेतात घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
देवयानी संदीप पाटील (वय १५ रा. धुपी ता. अमळनेर) असे मयत मुलीचे नाव आहे. तालुक्यातील धुपी गावात देवयानी पाटील ही मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि.२७ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नगाव शिवारातील शेत गट क्रमांक ७/१ मधील भाग्यश्री पिंगळे यांच्या शेतातील विहिरीत देवयानी पाटील ही तोल जावून पडल्याने तिचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने देवयानीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
त्यानंतर अमळनेर ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी देवयानीचे काका रावसाहेब लोटन पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे धुपी गावात शोककळा पसरली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.