जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली ते कुऱ्हाडदे दरम्यान रेल्वेरुळावर एका २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दि. १७ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघड झाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय रमेश चव्हाण (वय २८, रा. दापोरा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आईसह गावात राहत होता. शेळीपालन करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. दरम्यान, विजय चव्हाण याने सोमवारी दि. १७ रोजी संध्याकाळी तो शिरसोली ते कुऱ्हाडदे दरम्यान रात्री ८ वाजता रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. घटनेमुळे दापोरा गावात शोककळा पसरली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.