• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे अनावरण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 7, 2021
in कृषी
0
कांताईंच्या स्मृतीदिनी भवरलाल जैन यांच्या प्रेरणादायी विचारांच्या फलकाचे अनावरण

जळगाव दि.7 – भवरलाल जैन यांच्या पत्नी ‘कांताई’ यांचा सोोमवारी स्मृती दिन तसेच शेती-मातीत राबणा-या शेतकऱ्यांचा सखा बैल यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यानिमित्त शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे भवरलाल जैन यांचे प्रेरणादायी विचार जाता-येता डोळ्यांसमोर असावे, यासाठी भूमिपूत्राने घराच्या दर्शनी भागावर भवरलालजी जैन तथा मोठ्याभाऊंच्या विचारांचे फलक अनावरण केले.

धरणगाव तालुक्यातील सतखेडा येथील जी.नाना.पाटील गोशाळेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील हे त्या भूमिपूत्राचे नाव आहे. फलक अनावरणप्रसंगी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे सहकारी अनिल जोशी, अखिल भारतीय महिला बचत गटाच्या अध्यक्षा कृषीभुषण सुनंदा पाटील, सचिव छाया पाटील, सतखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कृषिभुषण शरद पाटील, आदर्श शेतकरी गंगाधर पाटील, मंडाबाई पाटील, डॉ. पुरूषोत्तम बी पाटील, सबवेअर काॕन्टॕक्टर अशोक पाटील, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, चंपालाल पाटील, भगवान पाटील, वसंत पाटील, नवल दोधू पाटील, जे.डी.आर्ट यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती आणि गायींचे संगोपनाचे महत्त्व सांगतांना प्रभाकर पाटील भवरलालजी जैन यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘दहावी पास झालो त्यावेळेस वडिल गंगाधर पाटील सालदारकी करायचे, वडिलांकडे 22 गुंठे जमीन तिही नापिक होती. त्यामुळे रोजगारासाठी जैन पाईपमध्ये लागलो. भवरलालजी जैन तथा मोठेभाऊ यांच्या नेतृत्व गुणांमुळे प्रभावित झालो. मोठ्याभाऊंचे ‘ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट केले तर देशाच्या विकास होतो’असे प्रेरणा देणाऱ्या विचार आत्मसात करण्याचा संकल्प केला. या संकल्पनेतुनच ‘ मुक्ताई’ हे देशी गायीचे संगोपन केलेले उत्पादन सुरू केले. यामध्ये देशी गायीचे दुध, तुप, ताक, अग्निहोत्र साठी लागणाऱ्या गौ-या, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेण आणि लाकुड मिश्रण करून एका विशिष्ट पध्दतीने गौ-या तयार केल्या जातात. यातुन महिलांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य असल्याचे प्रभाकर पाटील सांगतात. प्रत्येक घरात देशी गाय असावी यासाठी ते प्रयत्न करतात.

दुध संकलनातुन शेतकऱ्यांना हमी भाव देत ‘मुक्ताई’ हे सतखेडा गावातील उत्पादन मोठ्या शहरांमध्ये पोहोचवतात. हे सर्व कार्य जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या प्रेरणेमुळेच शक्य झाल्याचे प्रभाकर पाटील गौरवाने सांगतात. भवरलालजी जैन यांचे समाज घडविणारे विचार मला व माझ्या पुढच्या पिढीच्या कायम स्मरणात रहावे व गावातील तरूणांना वेगळे काही करणाची ऊर्जा देत रहावे यासाठी घराच्या दर्शनी भागावर कायमस्वरूपी फलक लावल्याचे प्रभाकर पाटील अभिमानाने सांगतात.


 

Next Post
व्याभिचार करणाऱ्यांना कठोर शासन करा.. – सर्व धर्मियांची मागणी

व्याभिचार करणाऱ्यांना कठोर शासन करा.. - सर्व धर्मियांची मागणी

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड
जळगाव जिल्हा

रंगमंचीय ज्युनिअर फेलोशिपसाठी नुपूर पांडे यांची महाराष्ट्रातून एकमेव निवड

June 17, 2026
व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप
शैक्षणिक

व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचा समारोप

June 17, 2026
विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर
राजकीय

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

June 17, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात इंटर्नशिप ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात प्रारंभ

June 16, 2026
मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन
जळगाव जिल्हा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या प्रवासातून आत्मनिर्भर आणि सुरक्षित भारताचा उदय; विकासासोबतच वारशाचेही संवर्धन

June 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group